अ‍ॅपशहर

'आभाळच फाटलय, शिवल्याशिवाय राहणार नाही'

राज्यात आधीच वित्तीय तूट असून ही वित्तीय तूट भरून काढावी लागणार आहे. त्यातच कर्जमाफी केल्याने राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार येणार आहे. मात्र तरीही त्यातून मार्ग काढू. सध्या आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. पण फाटलेलं आभाळ शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

Maharashtra Times 27 Jun 2017, 5:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm devendra fadnavis on maharashtra farmer loan waiver
'आभाळच फाटलय, शिवल्याशिवाय राहणार नाही'


राज्यात आधीच वित्तीय तूट असून ही वित्तीय तूट भरून काढावी लागणार आहे. त्यातच कर्जमाफी केल्याने राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार येणार आहे. मात्र तरीही त्यातून मार्ग काढू. सध्या आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. पण फाटलेलं आभाळ शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

सह्याद्री अतिथी गृहावर पुणतांब्यातील संपात भाग घेतलेल्या ४० गावच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनातील भावना बोलून दाखविल्या. आम्हाला कर्जमाफी करायचीच होती. कर्जमाफी करायचं राज्यसरकारच्या मनातच होतं. त्यामुळेच कर्जमाफी केली. जर मनातच नसतं, तर कर्जमाफी नाकारण्यासाठी अनेक कारणं होती, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठासून सांगितलं.राज्य सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असं केलं नाही, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

वित्त विभागाच्या सुचना नाकारल्या

वित्त विभागाने १५ हजार कोटींच्यावर कर्जमाफी करु नका अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली, असं सांगून एकप्रकारे वित्त विभागाच्या सुचना नाकारल्याचंच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शेतीसाठी सोलार फिडर आणू. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल. त्याची सुरुवात राळेगणसिद्धीतून होईल, असं त्यांनी सांगितलं. सध्या जे विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी कर्ज काढावं लागणार होतं. मात्र आता इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैसे उभारावे लागणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

'समृद्धी'साठी आंदोलनाची गरज नाही

समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार. समस्या संपणार नाही पण पर्याय शोधत जाऊ. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो. सरकार चर्चेसाठी नेहमी तयार असल्याचा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज