मुंबई :
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांसाठीच्या पुरस्कारांचे आज वितरण झाले. महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार शैलेश जाधव यांना राज्यस्तरीय तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्काराने मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले. २०१६ या वर्षासाठीचा हा पुरस्कार होता.
२०१७ या वर्षासाठीचा ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) महाराष्ट्र टाइम्सचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी खेमेंद्र कटरे यांना तर राज्यस्तरीय बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) नवभारत टाइम्सचे राजकुमार सिंह यांना प्रदान करण्यात आला.
२०१८ या वर्षासाठीचा राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे प्रवीण श्रीराम लोणकर यांना देण्यात आला. आज पुरस्कार मिळालेले पत्रकार राजकुमार सिंह आणि कांचन श्रीवास्तव यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याची घोषणा केली. त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस आज प्रदान करण्यात आले.
रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव
२०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी १ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१६ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे.
अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार
राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
पत्रकार सन्मान योजना सुरू
पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज या योजनेचा शुभारंभ केला. सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे. ही भूमिका त्यांनी जबादारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांसाठीच्या पुरस्कारांचे आज वितरण झाले. महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार शैलेश जाधव यांना राज्यस्तरीय तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्काराने मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले. २०१६ या वर्षासाठीचा हा पुरस्कार होता.
२०१७ या वर्षासाठीचा ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) महाराष्ट्र टाइम्सचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी खेमेंद्र कटरे यांना तर राज्यस्तरीय बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) नवभारत टाइम्सचे राजकुमार सिंह यांना प्रदान करण्यात आला.
२०१८ या वर्षासाठीचा राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे प्रवीण श्रीराम लोणकर यांना देण्यात आला. आज पुरस्कार मिळालेले पत्रकार राजकुमार सिंह आणि कांचन श्रीवास्तव यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याची घोषणा केली. त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस आज प्रदान करण्यात आले.
रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव
२०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी १ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१६ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे.
अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार
राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
पत्रकार सन्मान योजना सुरू
पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज या योजनेचा शुभारंभ केला. सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे. ही भूमिका त्यांनी जबादारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले.