अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांचा सुकाणू समितीवर हल्लाबोल

१५ ऑगस्टला देशाचा झेंडा फडकवू देणार नाही असं आंदोलन हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे, असं सुनावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकरी सुकाणू समिती आणि विरोधकांचा समाचार घेतला.

Maharashtra Times 17 Aug 2017, 7:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm devendra fadnavis slams shetkari sukanu samiti and oppositions
मुख्यमंत्र्यांचा सुकाणू समितीवर हल्लाबोल


१५ ऑगस्टला देशाचा झेंडा फडकवू देणार नाही असं आंदोलन हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे, असं सुनावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकरी सुकाणू समिती आणि विरोधकांचा समाचार घेतला.

चीनमध्ये पाऊस पडल्यावर भारतात छत्र्या उघडणारे लोक हे आंदोलन करत आहेत. पण त्यांची औकात नसल्याने ते काहीच करू शकले नाहीत, असा टोलाही त्यांनी हाणला.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत सरकारच्या कामांचा पाढा वाचला आणि विरोधकांवर निशाणा साधला. त्यावेळी त्यांनी शेतकरी सुकाणू समितीवरही हल्ला चढवला. सव्वा लाख कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी करा, ही मागणी अराजक पसरवण्यासाठीच केली जात असल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं. एवढी कर्जमाफी दिल्यास कुठलं राज्य जिवंत राहू शकेल?, असा सवालही त्यांनी केला.

शेतकऱ्यांसाठी विरोधक आंदोलनं करत आहेत. पण त्यांच्या आंदोलनात कार्यकर्तेही नाही. १००-१५०च्या वर माणसं नाहीत, अशी खिल्ली त्यांनी उडवली. त्याचवेळी, आंदोलनं करणं हे तुमचं काम आहे. सरकारला विरोधच करायचा तर करा, पण १५ ऑगस्टला झेंडा फडकवू देणार नाही असं आंदोलन हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे, अशी चपराक त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना लगावली. जे लोक निवडूनही येऊ शकत नाहीत ते लोक या समितीत आहेत. पण त्यांना कधी विरोध केला नाही. शेतकरी सुकाणू समितीचा उल्लेख जीवाणू समिती असा करत मला कोणाची औकात काढायची नाही, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.

आधीच्या सरकारने खड्डे खोदून ठेवलेत, आभाळाला भोकं पाडून ठेवली आहेत, ती आम्हाला बुजवावी लागताहेत, असा टोमणाही मुख्यमंत्र्यांनी मारला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज