अ‍ॅपशहर

एकनाथ शिंदे विधानसभेत मुलांच्या मृत्यूच्या आठवणीनं भावुक; नेमकं काय घडलं होतं?

आपला आतापर्यंतचा जीवनप्रवास सांगताना शिंदे यांचे डोळे पाणावले. माझी दोन मुलं डोळ्यादेखत गेली. त्यावेळी मी पूर्णपणे खचलो होतो. राजकारणातून, समाजकारणातून बाहेर पडलो होतो, असं शिंदे म्हणाले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2022, 3:48 pm
मुंबई: न्यायासाठी बंड करावं ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांना दिली, असं विधानसभेत विश्वास ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदेंनी त्यांच्या भाषणात त्यांचा आतापर्यंतचा प्रवास सांगितला. पदाच्या, खुर्चीच्या मोहानं आम्ही कधी वागलो नाही. त्यामुळेच आज इतके आमदार माझ्या पाठिशी उभी राहिले. अनेक आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं, असं शिंदे सभागृहात म्हणाले. आपला आतापर्यंतचा जीवनप्रवास सांगताना शिंदे यांचे डोळे पाणावले. माझी दोन मुलं डोळ्यादेखत गेली. त्यावेळी मी पूर्णपणे खचलो होतो. राजकारणातून, समाजकारणातून बाहेर पडलो होतो, असं शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shinde emotional
एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीनं भावुक


शिवसैनिक हेच मी माझं कुटुंब मानलं. माझ्या आयुष्यात जेव्हा दुःखद प्रसंग आला. दोन मुलं डोळ्यासमोरुन गेली. माझी दोन मुलं गेली तेव्हा आनंद दिघे यांनी मला आधार दिला. कशासाठी जगायचं आणि कुणासाठी जगायचं असं वाटलं. अनेकदा दिघे साहेब घरी आले. पण मी नाही उभा राहू शकत असं त्यांना सांगितलं. एकदा त्यांनी टेंभी नाक्यावर बोलावलं आणि खांद्यावर हात टाकला. तुला हे दुःख विसरुन दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावे लागतील हे सांगितलं. त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही, ही आठवण सांगताना शिंदे यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या.

माझं खच्चीकरण करण्यात येत होतं, आम्ही बंड नाही उठाव केलेला : एकनाथ शिंदे
आम्ही जो काही निर्णय घेतला, त्यात वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते. आमच्या सगळ्या आमदारांना ते माहित होतं. पण अजित दादांनी की कुणी तरी सांगितलं एकनाथ शिंदे नको. ही जबाबदारी तुम्हालाच (उद्धव ठाकरे) घ्यायचीय असं सांगण्यात आलं. पण एकदा अजित दादा सहजच बोलून गेले की इथे पण अपघात झालाय. तेव्हा त्यांनी सांगितलं आमचा विरोध असण्याचं कारण नाही. तरी मी ते सगळं विसरुन गेलो. सुरुवातीला मला सांगण्यात आलं आणि नंतर उद्धव साहेबांनाच मुख्यमंत्री व्हायचंय असं ठरलं. मी पदाच्या लालसेपोटी गेलो नाही, असं म्हणत शिंदेंनी आपल्या बंडामागची भूमिका स्पष्ट केली.
Gulabrao Patil: अजितदादांचा हेवा वाटतो! गुलाबराव पाटलांकडून माजी उपमुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक
महाविकास आघाडीसोबत गेल्यानं शिवसेनेच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक कशी जिंकू या चिंतेत सगळे होते. आमदार नेहमी म्हणायचे भाजप आपला नैसर्गिक मित्र आहे. आपण हे काय करतोय असं आमदार म्हणायचे. उद्धव साहेबांशी बोला अशी आमदारांची मागणी होती. मी पाच वेळा हा प्रयत्न केला. केसरकर याचे साक्षीदार आहेत. पण आम्हाला यश मिळालं नाही, असं शिंदे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज