अ‍ॅपशहर

‘आम्ही मांडवली करणारे नव्हेत’

आम्ही मांडवली करण्यातले नाहीत. कोण मांडवली करतोय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’प्रकरणी आपल्या सरकारने स्पष्ट भूमिका घेतली असून, कोणावरही पैसे देण्याची वा निधी देण्याची सक्ती केलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

Maharashtra Times 26 Oct 2016, 4:00 am
Naresh.kadam@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm phadanviss stand on military welfare row
‘आम्ही मांडवली करणारे नव्हेत’

Tweet : @nareshkadamMT
sanjay.vhanmane@timesgroup.com
Tweet : @vsanjayMT

मुंबई : आम्ही मांडवली करण्यातले नाहीत. कोण मांडवली करतोय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’प्रकरणी आपल्या सरकारने स्पष्ट भूमिका घेतली असून, कोणावरही पैसे देण्याची वा निधी देण्याची सक्ती केलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

भाजपप्रणित सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘मटा’ला विशेष मुलाखत देताना मुख्यमंत्री बोलत होते. प्रोड्युसर्स गिल्डने भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम न करू देण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शहिदांना श्रद्धांजली वाहण्याबाबतचा निर्णय त्यांनीच घेतला. त्यानंतर आर्मी वेल्फेअर फंडासाठी निधी देण्याबाबतही प्रोड्युसर्स गिल्डने इच्छा व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी हा निधी पाच कोटी रुपयांचा असावा, असे सांगितले. मात्र, या निधीबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती असू नये, असे मी स्पष्ट केले होते. मुकेश भट यांनीदेखील बैठकीनंतर बाहेर बोलताना सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. राज ठाकरे यांनी त्यांची मागणी स्वतःच्या पद्धतीने सांगितली. मात्र, विरोधकांनी भांडवल करीत सेटलमेंटचा आरोप केला. मात्र, अशा गोष्टींमुळे ‘भाजप आणि मनसे महापालिका निवडणुकीनिमित्ताने एकत्र येणार’ अशा वावड्या उठवल्या जात असल्या तरी यात काहीही तथ्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘पाच वर्षे मुख्यमंत्री राहणारच’

‘मध्यंतरी माझ्या वक्तव्यांचा चुकीचा अर्था काढला गेला व मी खुर्ची सोडेन, असा चुकीचा संदर्भ जोडला गेला. मी ज्या संस्कारातून आलो त्यात परिवर्तनाची लढाई हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी त्यासाठी झटत राहीन’, असे सांगतानाच, ‘मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहीन, जर चूक केली तरच जाईन’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भाजपप्रणित सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘मटा’ला विशेष मुलाखत देताना मुख्यमंत्री बोलत होते. ‘मराठा आरक्षण’ हे प्रकरण हाताळण्यात मी सफल झालो किंवा विफल झालो, असे मी मानत नाही. या सर्व मोर्चांमधून गेल्या तीस-चाळीस वर्षांमधील सामाजिक उद्रेक बाहेर पडतो आहे. सरकारकडून या मोर्चेकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. मागील सरकारने काहीच न केल्यामुळे हे मोर्चे रस्त्यावर आले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘युती व्हावी ही इच्छा’

शिवसेना-भाजपच्या महापालिकेतील युतीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत युती व्हावी या मताचाच मी आहे. त्यांचेही तसेच मत आहे. जागावाटपाबाबत योग्य पद्धतीने बोलणी व्हायला हवीत, अशी दोन्ही बाजूंनी अपेक्षा आहे.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज