अ‍ॅपशहर

औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

कचरा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार व दगडफेक केल्याच्या प्रकरणी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2018, 1:35 pm
मुंबई: कचरा प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार व दगडफेक केल्याच्या प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm sent aurangabad police commissioner on leave ordered an enquiry
औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी घोषणा केली. तसंच, या प्रकरणाची गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्या समितीच्या माध्यमातून एका महिन्यात चौकशी करण्यात येईल. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलनप्रकरणी स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र ज्यांनी पोलिसांना मारहाण केली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत अजित पवार, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर यांनी भाग घेतला.

विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रश्नी आज स्थगन प्रस्ताव मांडला. औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नी जनतेने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी कायदा हातात घेऊन त्यांना मारहाण केली. वर्दीत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या फोडल्या, महिला-मुलांना अमानुष मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या या राड्याचे व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत. मात्र, या प्रकरणात अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. यावर सरकार काय कारवाई करणार, असा सवाल करत यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

स्थगन प्रस्तावावर चर्चा होत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी सरकारने निवेदन करुन ९७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. या मागणीनंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिले. या प्रश्नी आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण यांनीही आपल्या संतप्त भावना मांडल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज