म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभेतील विरोधी पक्षाच्या दुसऱ्या बाकावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ अवघ्या ७२ तासांत संपला असली, तरी आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची वाटचाल सुरू होईल. मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांत राजकारणाचा बराच अनुभव गाठिशी असलेले फडणवीस हे पूर्वीप्रमाणे सत्तारूढ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर तुटून पडतील, की समन्वयाने वागतील हे येणाऱ्या काळात दिसेल.
सन २०१० ते २०१४ या कालखंडात विरोधी पक्षात फडणवीस यांची कारकीर्द बहरली आणि ते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसले. ते ज्या वर्गातून आले आहेत, ते महाराष्ट्राचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. या पदावर असताना त्यांनी अनेक बड्या नेत्यांचे काटे काढले. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत त्यांचा अंदाज चुकला अन्यथा आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. पाच वर्षांतील त्यांची ती सर्वात मोठी चूक झाली. ती सोडता चाणक्यनीतीत त्यांनी अन्य नेत्यांवर मात केली. शिवसेना पाठिंबा देत नसल्याने सरकार बनविण्यास नकार देण्याची फडणवीस यांची सुरुवातीची रणनीती अचूक होती. पण, एकीकडे शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सरकार बनवत असताना, सत्तेसाठी आतुरलेल्या त्यांच्या जवळच्या नेत्यांचे त्यांनी लाड पुरविले. अजित पवार यांच्यासारख्या बेभरवशाच्या नेत्याच्या सहकार्याने पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हे त्यांचे पाऊल चुकले.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सरकार बनवायला दिले असते, तर हे तीनचाकी सरकार हलवून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनता आले असते. पण ते आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असतील. १०५ आमदारांचे बळ त्यांच्या मागे असेल. सुरुवातीला त्यांच्या सरकारमधील अनेक घोटाळ्यांची प्रकरणे काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. त्याला ते कसे तोंड देतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले, तर ते राज्य चालविण्यात नवखे आहेत. उद्धव आणि देवेंद्र यांच्यातील जुगलबंदी सभागृहात बघायला मिळू शकेल.
पक्षासाठी एकमेव पर्याय
देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. परंतु समोर तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे भाजपकडे फडणवीस हाच योग्य पर्याय असल्याचे भाजपच्या नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे भविष्यात हे सरकार अस्थिर करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील.
विधानसभेतील विरोधी पक्षाच्या दुसऱ्या बाकावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ अवघ्या ७२ तासांत संपला असली, तरी आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची वाटचाल सुरू होईल. मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांत राजकारणाचा बराच अनुभव गाठिशी असलेले फडणवीस हे पूर्वीप्रमाणे सत्तारूढ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर तुटून पडतील, की समन्वयाने वागतील हे येणाऱ्या काळात दिसेल.
सन २०१० ते २०१४ या कालखंडात विरोधी पक्षात फडणवीस यांची कारकीर्द बहरली आणि ते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसले. ते ज्या वर्गातून आले आहेत, ते महाराष्ट्राचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. या पदावर असताना त्यांनी अनेक बड्या नेत्यांचे काटे काढले. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत त्यांचा अंदाज चुकला अन्यथा आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. पाच वर्षांतील त्यांची ती सर्वात मोठी चूक झाली. ती सोडता चाणक्यनीतीत त्यांनी अन्य नेत्यांवर मात केली. शिवसेना पाठिंबा देत नसल्याने सरकार बनविण्यास नकार देण्याची फडणवीस यांची सुरुवातीची रणनीती अचूक होती. पण, एकीकडे शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सरकार बनवत असताना, सत्तेसाठी आतुरलेल्या त्यांच्या जवळच्या नेत्यांचे त्यांनी लाड पुरविले. अजित पवार यांच्यासारख्या बेभरवशाच्या नेत्याच्या सहकार्याने पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हे त्यांचे पाऊल चुकले.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सरकार बनवायला दिले असते, तर हे तीनचाकी सरकार हलवून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनता आले असते. पण ते आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असतील. १०५ आमदारांचे बळ त्यांच्या मागे असेल. सुरुवातीला त्यांच्या सरकारमधील अनेक घोटाळ्यांची प्रकरणे काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. त्याला ते कसे तोंड देतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले, तर ते राज्य चालविण्यात नवखे आहेत. उद्धव आणि देवेंद्र यांच्यातील जुगलबंदी सभागृहात बघायला मिळू शकेल.
पक्षासाठी एकमेव पर्याय
देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. परंतु समोर तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे भाजपकडे फडणवीस हाच योग्य पर्याय असल्याचे भाजपच्या नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे भविष्यात हे सरकार अस्थिर करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील.