अ‍ॅपशहर

'नवाब मलिक चार-चार वेळा निवडून आले तेव्हा केंद्रातल्या यंत्रणा थाळ्या वाजवत होत्या का?'

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विरोधी पक्षाच्या सर्व आरोपांना उत्तरं दिली. त्याचवेळी, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणीही फेटाळून लावली.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2022, 5:10 pm
मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून सध्या कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीचे दोन दिवस विरोधकांनी याच मागणीवरून गोंधळ घातला होता. तसंच, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार आरोप केले होते. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विरोधकांच्या आरोपांना सणसणीत उत्तर दिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Uddhav-Thackeray
उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल


भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. 'नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप झाले आहेत. त्याची चौकशी होईल. ते दोषी असतील तर व्हायचं ते होईल. पण ते दाऊदचे हस्तक आहेत, याचा साक्षात्कार केंद्रीय तपास यंत्रणांना आताच कसा झाला? एक माणूस चार-चार वेळा विधानसभेवर निवडून येतो, देशभर फिरतो, मंत्री होतो. पण केंद्रीय तपास यंत्रणांना काही माहितीच नाही. या यंत्रणा इतक्या पोकळ आहेत का? त्या करतात काय? नुसत्या थाळ्या वाजवा, दिवे पेटवा आणि दिवे घालवा हेच करतात का? दिवेच लावत असाल तर त्या दिव्यांच्या प्रकाशात दाऊदची माणसं तरी शोधा, असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं.

वाचा: गरीब नागरिक तुमचं सरकार पाडू शकत नाहीत म्हणूनच हे चाललंय ना?; मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्याचा थेट

सत्ताधारी मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या व त्याबद्दलचे पुरावे तपास यंत्रणांना देणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी जोरदार निशाणा साधला. 'देवेंद्र फडणवीस यांनी ईडीला अनेक पुरावे दिल्याचं आम्हाला समजलं आहे. ईडी, रॉचे लोक इतके बेकार आहेत का? त्यांना फडणवीसांची गरज का लागते? तसं असेल तर फडणवीसांना केंद्रीय संस्थांमध्येच घ्यायला हवं,' असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. ईडीच्या कारवायांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मी कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राहणार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिलं. 'बाळासाहेबांना काय उत्तर देणार असं जे मला विचारतात, त्यांचे नेते बाळासाहेबांना काय उत्तर देणार?. संपूर्ण पक्ष आणि देश विरोधात असताना बाळासाहेब ज्यांच्या मागे उभे राहिले ते बाळासाहेबांना काय सांगणार?,' असा सवाल ठाकरे यांनी केला. ' आधी राम मंदिराच्या नावानं मतं मागितली, आता दाऊदच्या नावानं मतं मागितली जातायत. दाऊदला फरपटत आणण्याची भाषा केली होती, आता आपणच त्याच्या मागे फरपटत चाललो आहोत. ओबामांनी कधी ओसामाच्या नावानं मतं मागितली नव्हती. त्याच्या घरात घुसून त्याला मारलं. दाऊदच्या नावानं आरोप करण्यापेक्षा त्याच्या घरात घुसा. ती हिंमत दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं.

वाचा: गौरी गडाख आत्महत्या प्रकरण विधानसभेत, गृहमंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर

महत्वाचे लेख