म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. अशावेळी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे करोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील, त्या तुम्ही होऊ देऊ नका,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना गुरुवारी दिल्या.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील करोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच करोनामुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. करोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
'पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. अशावेळी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे करोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील, त्या तुम्ही होऊ देऊ नका,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना गुरुवारी दिल्या.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील करोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच करोनामुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. करोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.