मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित देण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray Resigns) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना त्यांच्या खास शैलीत टोला लगावला. न्यायदेवतेने आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा निकाल दिला. राज्यपालांनी आपल्याला दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. राज्यपालांना धन्यवाद, आपण लोकशाहीचा मान राखलात, आपल्याकडे पत्र दिल्याबरोबर तुमही तातडीने २४ तासांच्या आत आम्हाला फ्लोअर टेस्ट करायला सांगितली. त्याबरोबरीने मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. लोकशाहीचे पालन हे झालंच पाहिजे. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी गेल्या अडीच वर्षांपासून लटकून राहिली आहे. या यादीला आतातरी मंजुरी द्यावी. जेणेकरून तुमच्याविषयीचा आमच्या मनातील आदर द्विगुणित होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपले मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्यत्त्वाचा त्याग केल्याची घोषणा केली. मी अनपेक्षितपणे आलो होतो, आता अनपेक्षितपणे जात आहे. आता मी शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. सामान्य शिवसैनिक आणि तरुणांना घेऊन शिवसेना पुन्हा भरारी घेईल. आपल्यापासून ही शिवसेना कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
'शिवसेनाप्रमुखांनी रिक्षावाले, टपरीवाले अगदी हातभट्टीवाल्यांना आमदार-खासदार केलं'
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या आपल्या अखेरच्या फेसबुक लाईव्हमध्ये शिवसेनेतील बंडखोरांना टोले लगावले. शिवसेनाप्रमुखांनी रिक्षावाले, टपरीवाले अगदी हातभट्टीवाल्यांनाही चांगल्या मार्गावर आणलं. त्यांना नगरसेवक आणि आमदार बनवलं. मात्र, ही माणसं मोठी झाल्यावर त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आपण मोठं केलं, सत्ता आल्यावर शक्य ते सर्व दिलं तेच आज नाराज झाले आहेत. पण सामान्य शिवसैनिक मातोश्रीवर येऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. ज्यांना इतकं दिलं ते नाराज झाले अन् ज्यांना काहीच दिलं नाही, ते आज आपल्यासोबत आहेत. यालाच माणुसकी म्हणतात, हीच खरी शिवसेना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
'शिवसेनाप्रमुखांनी रिक्षावाले, टपरीवाले अगदी हातभट्टीवाल्यांना आमदार-खासदार केलं'
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या आपल्या अखेरच्या फेसबुक लाईव्हमध्ये शिवसेनेतील बंडखोरांना टोले लगावले. शिवसेनाप्रमुखांनी रिक्षावाले, टपरीवाले अगदी हातभट्टीवाल्यांनाही चांगल्या मार्गावर आणलं. त्यांना नगरसेवक आणि आमदार बनवलं. मात्र, ही माणसं मोठी झाल्यावर त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आपण मोठं केलं, सत्ता आल्यावर शक्य ते सर्व दिलं तेच आज नाराज झाले आहेत. पण सामान्य शिवसैनिक मातोश्रीवर येऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. ज्यांना इतकं दिलं ते नाराज झाले अन् ज्यांना काहीच दिलं नाही, ते आज आपल्यासोबत आहेत. यालाच माणुसकी म्हणतात, हीच खरी शिवसेना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.