अ‍ॅपशहर

cm thackeray on bullock cart race: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निकालामुळे बळीराजाचे आपल्या सर्जा-राजांवर असलेले प्रेम जिंकले आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2021, 8:58 am
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरी बंदी उठवल्यानंत आता राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील बेलगाडा मालकांमध्ये आणि शर्यतप्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे बळीराजाचे आपल्या सर्जा-राजांवर असलेले प्रेम जिंकले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. (cm uddhav thackeray welcomes the decision of supreme court of lifting ban on bullock cart race)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm uddhav thackeray welcomes the decision of supreme court of lifting ban on bullock cart race
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले. ही शर्यत आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्याचे काम करते असे सांगत या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- 'हे लोकशाहीत चालतं का?'; राज्यपालांच्या 'त्या' भूमिकेवर अजित पवार यांचा खरमरीत सवाल

आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. बैलगाडी शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. या परंपरेतून पशूधनाचे जतन करणे आणि संवर्धन करण्याचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमुळे याला प्रोत्साहन मिळत आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईकरांसाठी मोठी बातमी; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ आणि चिवट लढा द्यावा लागलेला आहे. या मागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळ होते. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे कशी काळजी घेतात हे सर्वांना माहीत आहे. आता शर्यती सुरु होतील. यामुळे आपली लोकपरंपरा आणि पशूधनाचे वैभव सगळ्यांना पाहता येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- ओमिक्रॉनबाबत चिंता वाढवणारी बातमी; आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे विधान, म्हणाले...

महत्वाचे लेख