अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांच्या टीव्ही शोवर ४ कोटींचा खर्च

राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी मुख्यमंत्री बोलतोय', 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' हे कार्यक्रम दूरचित्रवाणीवर सुरू केले आहेत. या कार्यक्रमांच्या प्रत्येक भागावर (शो) २७ लाख ९ हजार ४०० रूपये खर्च करण्यात येत असून या शोवर वर्षाला ४ कोटी ४५ लाख १२ हजार आठशे रूपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्यावर कोट्यवधी रूपयांचे कर्ज असताना मुख्यमंत्र्यांनी या शोवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणे योग्य आहे काय? असा सवाल केला जात आहे.

Maharashtra Times 24 Oct 2017, 12:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cms tv shows costing government 4 cr
मुख्यमंत्र्यांच्या टीव्ही शोवर ४ कोटींचा खर्च


राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी मुख्यमंत्री बोलतोय', 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' हे कार्यक्रम दूरचित्रवाणीवर सुरू केले आहेत. या कार्यक्रमांच्या प्रत्येक भागावर (शो) २७ लाख ९ हजार ४०० रुपये खर्च करण्यात येत असून संपूर्ण वर्षात त्यावर ४ कोटी ४५ लाख १२ हजार आठशे रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी रेडिओवरून 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू केला. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सह्याद्री' दूरचित्रवाणीवर 'जय महाराष्ट्र', 'दिलखुलास' आणि 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हे कार्यक्रम सुरू केले आहेत. महिन्यातून दोनदा हा कार्यक्रम दूर चित्रवाणीवर दाखविण्यात येतो. वर्षाला त्याचे एकूण २४ भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण, चित्रीकरणाचे क्रोमा करणे, कलर करेक्शन, मॉन्टेज म्युझिक, मेकअप, लाईटमन, प्लोअर मनसह कार्यक्रमाची निर्मिती आणि चित्रीकरणासाठी एकूण ४ कोटी ४५ लाख १२ हजार ८०० रूपये खर्च होणार आहेत. या खर्चाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारने ५ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या प्रसिद्धी विभागानं या खर्चाचं समर्थन केलं आहे. मार्केट रेटपेक्षा या कार्यक्रमांचा खर्च खूपच कमी आहे. तुलनेने आम्ही कमी खर्चात हा कार्यक्रम करत असल्याचं प्रसिद्धी विभागाचं म्हणणं आहे. तर मार्केट रेट पेक्षा या कार्यक्रमांवरचा खर्च अधिक आहे. या खर्चाला मंजुरी देण्यापूर्वी त्याची शहानिशा करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज