म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः दिवाळीपासून प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्राला नाताळदरम्यान थंडीचा अनुभव मिळण्याचा अंदाज आहे. सध्याच्या उत्तरेतील वातावरणाच्या स्थितीनुसार नाताळपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्येही कमाल तापमानामध्ये घसरण होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे किमान वर्षाच्या शेवटी तरी मुंबईसह राज्यात थंडीचा अनुभव घेता येणार आहे. मात्र ही थंडी किती काळ टिकेल, याबद्दल सध्या अंदाज व्यक्त करण्यात येत नाही.
हवामान विभागाने मंगळवारी जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार उत्तरेमध्ये शीतलहरीची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील तापमानामध्येही घट होण्याचा अंदाज असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. यामध्ये कमाल आणि किमान दोन्ही तापमानांमध्ये २५ डिसेंबरपासून घट व्हायला सुरुवात होईल. तापमानात झालेली घट वर्षअखेरपर्यंत कायम राहील, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र थंडीचे उशिरा आगमन झाल्याने पावसाप्रमाणेच थंडी दीर्घकाळ रेंगाळेल का, यावर सध्या भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार २६ डिसेंबरपर्यंत पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली येथे अनेक भागांमध्ये शीतलहर ते अतितीव्र शीतलहर जाणवण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतरच्या काळात हा परिणाम तुरळक ठिकाणी जाणवू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशातही हीच परिस्थिती पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत कायम राहू शकते, तर पूर्व उत्तर प्रदेशात मात्र अनेक ठिकाणी तीव्र शीतलहर डिसेंबरअखेरपर्यंत जाणवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीव्र शीतलहरीदरम्यान कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा ६.४ किंवा अधिक अंशांनी खाली घसरू शकते. बिहार, उत्तर राजस्थान येथे काही ठिकाणी शीतलहरीची तीव्रता नागरिकांना जाणवू शकेल. या काळात काही ठिकाणी धुक्याचे प्रमाणही तीव्र असेल.
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार सिंधुदुर्ग येथे बुधवारी आणि गुरुवारी हलक्या सरींची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड येथेही बुधवारी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सूर्यग्रहणावेळी आभाळ ढगाळ ?
गुरुवार, २६ डिसेंबरला सूर्यग्रहण दिसणार आहे. मुंबईतून तसेच राज्यातून खंडग्रास स्थिती दिसणे अपेक्षित होते. सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या बुधवारी आणि गुरुवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे पावसाची शक्यता आहे. तसेच आभाळही ढगाळ असेल असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी मुंबई वगळता इतर ठिकाणी ढगाळ हवामानामुळे निराशा होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने मंगळवारी जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार उत्तरेमध्ये शीतलहरीची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील तापमानामध्येही घट होण्याचा अंदाज असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. यामध्ये कमाल आणि किमान दोन्ही तापमानांमध्ये २५ डिसेंबरपासून घट व्हायला सुरुवात होईल. तापमानात झालेली घट वर्षअखेरपर्यंत कायम राहील, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र थंडीचे उशिरा आगमन झाल्याने पावसाप्रमाणेच थंडी दीर्घकाळ रेंगाळेल का, यावर सध्या भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार २६ डिसेंबरपर्यंत पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली येथे अनेक भागांमध्ये शीतलहर ते अतितीव्र शीतलहर जाणवण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतरच्या काळात हा परिणाम तुरळक ठिकाणी जाणवू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशातही हीच परिस्थिती पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत कायम राहू शकते, तर पूर्व उत्तर प्रदेशात मात्र अनेक ठिकाणी तीव्र शीतलहर डिसेंबरअखेरपर्यंत जाणवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीव्र शीतलहरीदरम्यान कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा ६.४ किंवा अधिक अंशांनी खाली घसरू शकते. बिहार, उत्तर राजस्थान येथे काही ठिकाणी शीतलहरीची तीव्रता नागरिकांना जाणवू शकेल. या काळात काही ठिकाणी धुक्याचे प्रमाणही तीव्र असेल.
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार सिंधुदुर्ग येथे बुधवारी आणि गुरुवारी हलक्या सरींची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड येथेही बुधवारी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सूर्यग्रहणावेळी आभाळ ढगाळ ?
गुरुवार, २६ डिसेंबरला सूर्यग्रहण दिसणार आहे. मुंबईतून तसेच राज्यातून खंडग्रास स्थिती दिसणे अपेक्षित होते. सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या बुधवारी आणि गुरुवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे पावसाची शक्यता आहे. तसेच आभाळही ढगाळ असेल असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळी मुंबई वगळता इतर ठिकाणी ढगाळ हवामानामुळे निराशा होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.