मुंबई
महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १८ हजार बसेस आहे. ग्रामीण, दुर्गम भागात सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवाशांची संख्या कमी होत आहे. काही वर्षांपर्यंत एसटीतील दैनंदिन प्रवाशांची संख्या ७५ लाखांवरून ६५-६६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालणे कठीण झाले आहे. सरकारकडे शेकडो कोटी रक्कम थकीत स्वरूपात आहे. ती रक्कम क्वचित मिळत जात असली, तरी त्यातून तोटा कमी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महामंडळाचा तोटा १८०० कोटी रुपयांवर गेला आहे. अशावेळी हा तोटा कमी करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. त्यातूनच खाजगी बसवाहतूकदारांना तुल्यबळ स्पर्धा देण्यासाठी आणि महामंडळास नफ्यात आणण्यासारख्या शिवशाहीसारख्या संकल्पना उभारी देण्यास सहाय्यभूत ठरतील. अशा वेळी नव्या सुविधा देतानाच स्पर्धात्मक दर देण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे. त्यातूनच शिवनेरीच्या धर्तीवरील शिवशाही बसेसची संकल्पना अमलात आणली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी आणि प्रवाशांना आरामदायी, स्वस्त आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही या नव्या अत्याधुनिक बसेस आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतल्या. या शिवशाहीची पहिली बस कोकणासाठी धावली. त्यानंतर लातूरचा क्रमांक लागला. महिन्याअखेरीस राज्यातील १० मार्गांवर या सेवेचा विस्तार होणार आहे. संपूर्णतः एसी असूनही या सेवा निमआराम स्तरावर असून त्याप्र्रमाणे तिकीट आकारले जाते. त्यामुळे खासगी वाहतूकदारांकडून मिळणाऱ्या स्पर्धेच्या तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता महामंडळाकडे येईल, असा दावाही केला जात आहे.
२२ जानेवारी २०१६ रोजी शिवशाहीची घोषणा झाली. त्यात सुरुवातीला एका कंपनीने निविदा भरली. पण त्यानंतर त्यातून माघार घेतल्याने ही प्रक्रिया रखडली. तरी नंतरच्या काळात काही कंपन्यांनी त्यात रस दाखविला. एसटी महामंडळाचा तोटा वाढत चालला असल्याने शिवनेरी मॉडेलनुसार सेवा चालविण्यावर भर दिला आहे. सवलतीच्या तिकिटांसह अन्य कारणांमुळे एसटीला तोटा होतो. त्यासाठीच उत्पन्नात वाढविण्यासाठी शिवनेरी मॉडेलचा विस्तार शिवशाही सेवेत करण्यात येत आहे. यामध्ये एसी बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येतात. निविदेमार्फत भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बसेसमध्ये ड्रायव्हर कंत्राटदारातर्फे नेमला जातो. कंत्राटी स्वरुपाने बस सेवा दिली जात असल्याने अतिरिक्त खर्चाची जबाबदारी एसटीवर येत नाही. कंत्राटदाराने मान्य केलेल्या रक्कमेनुसार संबंधित रक्कम एसटीला मिळते. तेच स्वरुप शिवशाहीमध्ये अवलंबिण्यात आल्याचे लक्षात येते.
सध्या रत्नागिरी, लातूर मार्गावर शिवशाही बसेस चालविल्या जात आहेत. महिन्याअखेरीस सुमारे ३० बसेस सेवेत येणार असून त्याचा विस्तार १० मार्गांवर केला जाणार आहे. वाढत्या तोट्यातून मार्ग काढण्यासाठी शिवशाही बसेस उपयुक्त ठरतील, असे मानले जाते. शिवशाही बसेसमध्ये वायफाय सेवा पुरविण्याचीही तयारी चालविली जात आहे. वायफायसारख्या अत्याधुनिक सेवांमुळे एसटीच्या प्रवाशांमध्ये आणखी वाढ होण्यास मदत मिळू शकेल.
मुंबई ते पुणे मार्गावर एसटीच्या शिवनेरी बसेसनी खासगी वाहतूकदारांना चांगलीच स्पर्धा दिली आहे. एकूणच एसटी सेवेस अवैध वाहतुकीप्रमाणेच खाजगी बसवाहतूकदारांच्या सेवांमुळे मोठे नुकसान होते. चांगल्या दर्जाच्या सेवा, उत्तम बसेस आणि ऑफ सीझनमध्ये स्वस्त दरांमुळे प्रवासी खाजगी बसवाहतूकदारांकडे वळतात. हे चित्र शिवशाही बससेवेमुळे मोडकळीस येण्याची चिन्हे आहेत. परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शिवशाही बससेवेच्या सहाय्याने उत्तम सेवा देता येईल, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार ही संकल्पना विस्ताराने राबविली जात आहे.
महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १८ हजार बसेस आहे. ग्रामीण, दुर्गम भागात सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रवाशांची संख्या कमी होत आहे. काही वर्षांपर्यंत एसटीतील दैनंदिन प्रवाशांची संख्या ७५ लाखांवरून ६५-६६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालणे कठीण झाले आहे. सरकारकडे शेकडो कोटी रक्कम थकीत स्वरूपात आहे. ती रक्कम क्वचित मिळत जात असली, तरी त्यातून तोटा कमी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महामंडळाचा तोटा १८०० कोटी रुपयांवर गेला आहे. अशावेळी हा तोटा कमी करण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. त्यातूनच खाजगी बसवाहतूकदारांना तुल्यबळ स्पर्धा देण्यासाठी आणि महामंडळास नफ्यात आणण्यासारख्या शिवशाहीसारख्या संकल्पना उभारी देण्यास सहाय्यभूत ठरतील. अशा वेळी नव्या सुविधा देतानाच स्पर्धात्मक दर देण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे. त्यातूनच शिवनेरीच्या धर्तीवरील शिवशाही बसेसची संकल्पना अमलात आणली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांना टक्कर देण्यासाठी आणि प्रवाशांना आरामदायी, स्वस्त आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही या नव्या अत्याधुनिक बसेस आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतल्या. या शिवशाहीची पहिली बस कोकणासाठी धावली. त्यानंतर लातूरचा क्रमांक लागला. महिन्याअखेरीस राज्यातील १० मार्गांवर या सेवेचा विस्तार होणार आहे. संपूर्णतः एसी असूनही या सेवा निमआराम स्तरावर असून त्याप्र्रमाणे तिकीट आकारले जाते. त्यामुळे खासगी वाहतूकदारांकडून मिळणाऱ्या स्पर्धेच्या तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता महामंडळाकडे येईल, असा दावाही केला जात आहे.
२२ जानेवारी २०१६ रोजी शिवशाहीची घोषणा झाली. त्यात सुरुवातीला एका कंपनीने निविदा भरली. पण त्यानंतर त्यातून माघार घेतल्याने ही प्रक्रिया रखडली. तरी नंतरच्या काळात काही कंपन्यांनी त्यात रस दाखविला. एसटी महामंडळाचा तोटा वाढत चालला असल्याने शिवनेरी मॉडेलनुसार सेवा चालविण्यावर भर दिला आहे. सवलतीच्या तिकिटांसह अन्य कारणांमुळे एसटीला तोटा होतो. त्यासाठीच उत्पन्नात वाढविण्यासाठी शिवनेरी मॉडेलचा विस्तार शिवशाही सेवेत करण्यात येत आहे. यामध्ये एसी बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येतात. निविदेमार्फत भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बसेसमध्ये ड्रायव्हर कंत्राटदारातर्फे नेमला जातो. कंत्राटी स्वरुपाने बस सेवा दिली जात असल्याने अतिरिक्त खर्चाची जबाबदारी एसटीवर येत नाही. कंत्राटदाराने मान्य केलेल्या रक्कमेनुसार संबंधित रक्कम एसटीला मिळते. तेच स्वरुप शिवशाहीमध्ये अवलंबिण्यात आल्याचे लक्षात येते.
सध्या रत्नागिरी, लातूर मार्गावर शिवशाही बसेस चालविल्या जात आहेत. महिन्याअखेरीस सुमारे ३० बसेस सेवेत येणार असून त्याचा विस्तार १० मार्गांवर केला जाणार आहे. वाढत्या तोट्यातून मार्ग काढण्यासाठी शिवशाही बसेस उपयुक्त ठरतील, असे मानले जाते. शिवशाही बसेसमध्ये वायफाय सेवा पुरविण्याचीही तयारी चालविली जात आहे. वायफायसारख्या अत्याधुनिक सेवांमुळे एसटीच्या प्रवाशांमध्ये आणखी वाढ होण्यास मदत मिळू शकेल.
मुंबई ते पुणे मार्गावर एसटीच्या शिवनेरी बसेसनी खासगी वाहतूकदारांना चांगलीच स्पर्धा दिली आहे. एकूणच एसटी सेवेस अवैध वाहतुकीप्रमाणेच खाजगी बसवाहतूकदारांच्या सेवांमुळे मोठे नुकसान होते. चांगल्या दर्जाच्या सेवा, उत्तम बसेस आणि ऑफ सीझनमध्ये स्वस्त दरांमुळे प्रवासी खाजगी बसवाहतूकदारांकडे वळतात. हे चित्र शिवशाही बससेवेमुळे मोडकळीस येण्याची चिन्हे आहेत. परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शिवशाही बससेवेच्या सहाय्याने उत्तम सेवा देता येईल, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार ही संकल्पना विस्ताराने राबविली जात आहे.