म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील बालमृत्यू, अर्भकमृत्यू, उपजत मृत्यू यांचे प्रमाण आटोक्यात असले तरी यात आणखी कशी घट होईल, याकडे आता आरोग्य खात्याने लक्ष केंद्रीत केले आहे. एनआयसीयूमध्ये अर्भकाची विशेष काळजी कशी घेतली जाईल, जंतू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणखी काय उपाय योजना करणे आवश्यक आहे, तसेच उपजत मृत्यू कसे कमी होतील याबाबत निओनॅटॅलॉजिस्ट तज्ज्ञांचा समावेश असेल, अशा डॉक्टरांची समिती गठित करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. नाशिकमधील बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला महत्त्व असल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
राज्यातील कार्यरत ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिक यांचा देखील समावेश आहे. यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात राज्य सरकारला यश मिळत आहे. मात्र, यामध्ये अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके, रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अशा अर्भकांना पटकन जंतूसंसर्ग होतो. अनेकदा खाजगी रुग्णालयातून अशा प्रकारची 'क्रिटकिली इल' बालके शेवटच्या क्षणी संदर्भीत केली जातात, त्यामुळे मृत्यूंच्या आकड्यात वाढ होते, असे देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणतः ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही बाहेरून संदर्भित केलेली आहेत. जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची संख्या ८६५ म्हणजे ५३ टक्के आहे. विशेष नवजात दक्षता कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. त्यामुळे त्यांची श्वसन आणि हृदय क्षमता बेताचीच असते. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
राज्यातील बालमृत्यू, अर्भकमृत्यू, उपजत मृत्यू यांचे प्रमाण आटोक्यात असले तरी यात आणखी कशी घट होईल, याकडे आता आरोग्य खात्याने लक्ष केंद्रीत केले आहे. एनआयसीयूमध्ये अर्भकाची विशेष काळजी कशी घेतली जाईल, जंतू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणखी काय उपाय योजना करणे आवश्यक आहे, तसेच उपजत मृत्यू कसे कमी होतील याबाबत निओनॅटॅलॉजिस्ट तज्ज्ञांचा समावेश असेल, अशा डॉक्टरांची समिती गठित करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. नाशिकमधील बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला महत्त्व असल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
राज्यातील कार्यरत ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिक यांचा देखील समावेश आहे. यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात राज्य सरकारला यश मिळत आहे. मात्र, यामध्ये अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके, रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अशा अर्भकांना पटकन जंतूसंसर्ग होतो. अनेकदा खाजगी रुग्णालयातून अशा प्रकारची 'क्रिटकिली इल' बालके शेवटच्या क्षणी संदर्भीत केली जातात, त्यामुळे मृत्यूंच्या आकड्यात वाढ होते, असे देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणतः ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही बाहेरून संदर्भित केलेली आहेत. जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची संख्या ८६५ म्हणजे ५३ टक्के आहे. विशेष नवजात दक्षता कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. त्यामुळे त्यांची श्वसन आणि हृदय क्षमता बेताचीच असते. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.