मुंबई :
भीमा-कोरेगावच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे मुंबईसह महाराष्ट्रात आज हिंसक पडसाद उमटले. या हिंसेच्या निषेधार्थ आज औरंगाबादमध्ये बंद पाळण्यात आला. तर अहमदनगर, पुणे, नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला. चेंबूरमध्ये रेल रोको करण्यात आल्याने कुर्ला ते पनवेल दरम्यान हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्याने अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मुंबईतील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथे बंद दरम्यान जोरदार दगडफेक झाल्याने संपूर्ण शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आमखास मैदान येथे सकाळी एक बस फोडण्यात आल्यानंतर सकाळी ७ वाजेपासून मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक थांबविण्यात आली. दोन तासानंतर पोलिसांच्या मदतीने बस सेवा सुरू करण्यात आल्या. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा, बहुतेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. हार्बरपाठोपाठ ट्रान्सहार्बरवरही परिणाम झाला आहे. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला. सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज सकाळी ११. ४५ वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. त्यामुळे २५ मिनिटानंतर हार्बर सेवा सुरळीत सुरू झाली. परंतु त्यानंतर पुन्हा रेलरोको करण्यात आल्याने हार्बर सेवा ठप्प झाली आहे.
चेंबूर नाका बंद
चेंबूरमध्ये रेल रोको केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने चेंबूरच्या अनेक भागात रास्ता रोको करण्यात आला. चेंबूर नाका येथे शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत चेंबूर नाका येथे कडकडीत बंद पाळला. यावेळी बेस्ट बसेसनाही टार्गेट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमर महल जंक्शन येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत बेस्ट बसेससह अनेक वाहनांची तोडफोड केली. चेंबूरमधील या आंदोलनाचे लोण गोवंडी, मानखुर्द, मुलूंड, विक्रोळी आणि सायनपर्यंत पोहचलं. या भागात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला.
सायन-पनवेल महामार्ग रोखला
दुपारनंतर या आंदोलनाचे लोण मुंबईभर पसरले आहे. आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन करून हा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईहून पनवेल आणि पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर अजूनही ठाण मांडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कांजूरमार्ग, वडाळा, सायन कोळीवाडा आणि भांडूप आदी भागातही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.
देवळाली बंद
या हिंसेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देवळाली येथे बंद पुकारला. शेकडो रिपाइं कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत धरणे धरली. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने देवळालीत पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
भीमा-कोरेगावच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे मुंबईसह महाराष्ट्रात आज हिंसक पडसाद उमटले. या हिंसेच्या निषेधार्थ आज औरंगाबादमध्ये बंद पाळण्यात आला. तर अहमदनगर, पुणे, नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला. चेंबूरमध्ये रेल रोको करण्यात आल्याने कुर्ला ते पनवेल दरम्यान हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्याने अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मुंबईतील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
औरंगाबाद येथे बंद दरम्यान जोरदार दगडफेक झाल्याने संपूर्ण शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आमखास मैदान येथे सकाळी एक बस फोडण्यात आल्यानंतर सकाळी ७ वाजेपासून मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक थांबविण्यात आली. दोन तासानंतर पोलिसांच्या मदतीने बस सेवा सुरू करण्यात आल्या. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा, बहुतेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आंदोलकांनी चेंबूरमध्ये रेल रोको केल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. हार्बरपाठोपाठ ट्रान्सहार्बरवरही परिणाम झाला आहे. चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला. सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज सकाळी ११. ४५ वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. त्यामुळे २५ मिनिटानंतर हार्बर सेवा सुरळीत सुरू झाली. परंतु त्यानंतर पुन्हा रेलरोको करण्यात आल्याने हार्बर सेवा ठप्प झाली आहे.
चेंबूर नाका बंद
चेंबूरमध्ये रेल रोको केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने चेंबूरच्या अनेक भागात रास्ता रोको करण्यात आला. चेंबूर नाका येथे शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत चेंबूर नाका येथे कडकडीत बंद पाळला. यावेळी बेस्ट बसेसनाही टार्गेट करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमर महल जंक्शन येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत बेस्ट बसेससह अनेक वाहनांची तोडफोड केली. चेंबूरमधील या आंदोलनाचे लोण गोवंडी, मानखुर्द, मुलूंड, विक्रोळी आणि सायनपर्यंत पोहचलं. या भागात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला.
सायन-पनवेल महामार्ग रोखला
दुपारनंतर या आंदोलनाचे लोण मुंबईभर पसरले आहे. आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन करून हा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईहून पनवेल आणि पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर अजूनही ठाण मांडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कांजूरमार्ग, वडाळा, सायन कोळीवाडा आणि भांडूप आदी भागातही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.
देवळाली बंद
या हिंसेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देवळाली येथे बंद पुकारला. शेकडो रिपाइं कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत धरणे धरली. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने देवळालीत पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.