म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्याचे रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोपाचा पुनरुच्चार करून, त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल. टहिलयानी यांच्याकडे कागदपत्रासहित बुधवारी लेखी तक्रार केली आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या २० वर्षांत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करून सरकारचे नुकसान केल्याचा दावा मलिक यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. दोन दशकात धुळे व नंदुरबार या दोन जिल्ह्यांत कोणकोणत्या प्रकल्पांत किती जमिनी विकत घेतल्या, किती जमिनी धारण केल्या, याबाबतची माहिती दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.
वेगवेगळ्या प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनीचा किती मोबदला मिळाला, याची माहिती घेण्याची, तसेच आणखी माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती पुरवणी तक्रार म्हणून घेण्याची विनंतीही मलिक यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या चार पानी लेखी तक्रारीत केली आहे. नवाब मलिक यांनी रावल यांच्याशी संबंधित त्या दोन्ही जिल्ह्यातील जमीन व्यवहार प्रकरणाबाबतची कागदपत्रे लोकायुक्तांच्या कार्यालयात जाऊन सादर करून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.
राज्याचे रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोपाचा पुनरुच्चार करून, त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल. टहिलयानी यांच्याकडे कागदपत्रासहित बुधवारी लेखी तक्रार केली आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या २० वर्षांत जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करून सरकारचे नुकसान केल्याचा दावा मलिक यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. दोन दशकात धुळे व नंदुरबार या दोन जिल्ह्यांत कोणकोणत्या प्रकल्पांत किती जमिनी विकत घेतल्या, किती जमिनी धारण केल्या, याबाबतची माहिती दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.
वेगवेगळ्या प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनीचा किती मोबदला मिळाला, याची माहिती घेण्याची, तसेच आणखी माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती पुरवणी तक्रार म्हणून घेण्याची विनंतीही मलिक यांनी लोकायुक्तांकडे केलेल्या चार पानी लेखी तक्रारीत केली आहे. नवाब मलिक यांनी रावल यांच्याशी संबंधित त्या दोन्ही जिल्ह्यातील जमीन व्यवहार प्रकरणाबाबतची कागदपत्रे लोकायुक्तांच्या कार्यालयात जाऊन सादर करून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.