म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेनच्या मार्गक्रमणात ठाणे ते विरार खाडीतून २१ किमीचा भुयारी मार्ग नेण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीवर जमीन उपलब्ध होण्यातील अडचण दूर होणार आहे. या बोगद्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात भूकंपप्रतिरोधक क्षमता चाचणीचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गात आठ बोगद्यांचा समावेश असून ठाणे ते विरार हा सर्वाधिक मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे.
बुलेट ट्रेनचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कामे हाती घेतली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शक्य त्या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचेही कामही यापूर्वीच हाती घेण्यात आले आहे. त्यातून हिरवा कंदील मिळणाऱ्या जागांवर कामे हाती घेतली जाणार आहेत. जूनपासून मार्ग उभारणीसाठी कामे हाती घेतली जाणार असून त्यात मुंबई, बडोदा आदी भागांचा समावेश आहे.
बुलेट ट्रेनसाठी २९ हजार कर्मचारी आवश्यक असून त्यातील २५ हजार कर्मचारी हंगामी तत्त्वावर राहणार आहेत. ४ हजार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या बडोदा येथील रेल्वे विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी जपानमध्ये पाठवण्यात येत असल्याचे राष्ट्रीय हायस्पीड रेल निगमचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनच्या मार्गात ४७ पुलांचा समावेश असून त्यापैकी राज्यात २७ पूल असतील. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर ५०८ किमी असून त्यासाठी अंदाजे एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. ही बुलेट ट्रेन देशाच्या ७५व्या स्वातंत्रदिनी, १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू करण्याचा मानस आहे. या ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी असला तरीही प्रत्यक्षातील सरासरी वेग ताशी ३२० किमी असेल. ५०८ किमीचे हे अंतर बुलेट ट्रेन दोन तासांत पूर्ण करेल, असा दावा करण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक वेगवान गाड्यांमध्ये समावेश असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसमधून मुंबई ते अहमदाबाद अंतर पूर्ण करण्यासाठी किमान सात तास लागतात.
इंजिनचे मॉडेल प्रदर्शनात
वांद्रे येथे सुरू असलेल्या मॅग्नेट महाराष्ट्र प्रदर्शनात बुलेट ट्रेनच्या इंजिनाशी साम्य असणारे मॉडेल तयार केले आहे. जपानमध्ये धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी ई-५ मालिकेचे इंजिन वापरण्यात येते. त्यावर आधारित हे मॉडेल आहे. निविदा प्रक्रियेत जपानसाठी २० टक्के प्रमाण आरक्षित ठेवण्यात आले असून ८० टक्के भाग देश वा जागतिक स्तरावरील कंपन्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष इंजिन निर्मितीसाठी मेक इन इंडिया संकल्पना वापरताना जपानमधील तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले जाणार आहे.
अशी असेल बुलेट ट्रेन!
वेग-ताशी ३२० किमी
प्रकल्पपूर्तीचा काळ- सात वर्षे
५०८ किमीपैकी १२० किमीचा मार्ग महाराष्ट्रातून
तिकीट -२७०० ते ३ हजार रु.
१० डब्यांच्या बुलेट ट्रेनची प्रवासी क्षमता -७५०.
१२ पैकी चार स्थानके राज्यात
मार्ग- वांद्रे-कुर्ला, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरिया, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, अहमदाबाद, साबरमती
भागभांडवल- राज्य सरकारचे २० हजार कोटी रुपये
कर्ज-जपान सरकारकडून ०.१ टक्के व्याजाने ८८ हजार कोटी
मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या पहिल्यावहिल्या बुलेट ट्रेनच्या मार्गक्रमणात ठाणे ते विरार खाडीतून २१ किमीचा भुयारी मार्ग नेण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीवर जमीन उपलब्ध होण्यातील अडचण दूर होणार आहे. या बोगद्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात भूकंपप्रतिरोधक क्षमता चाचणीचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गात आठ बोगद्यांचा समावेश असून ठाणे ते विरार हा सर्वाधिक मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे.
बुलेट ट्रेनचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कामे हाती घेतली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून शक्य त्या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचेही कामही यापूर्वीच हाती घेण्यात आले आहे. त्यातून हिरवा कंदील मिळणाऱ्या जागांवर कामे हाती घेतली जाणार आहेत. जूनपासून मार्ग उभारणीसाठी कामे हाती घेतली जाणार असून त्यात मुंबई, बडोदा आदी भागांचा समावेश आहे.
बुलेट ट्रेनसाठी २९ हजार कर्मचारी आवश्यक असून त्यातील २५ हजार कर्मचारी हंगामी तत्त्वावर राहणार आहेत. ४ हजार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या बडोदा येथील रेल्वे विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी जपानमध्ये पाठवण्यात येत असल्याचे राष्ट्रीय हायस्पीड रेल निगमचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनच्या मार्गात ४७ पुलांचा समावेश असून त्यापैकी राज्यात २७ पूल असतील. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे अंतर ५०८ किमी असून त्यासाठी अंदाजे एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. ही बुलेट ट्रेन देशाच्या ७५व्या स्वातंत्रदिनी, १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू करण्याचा मानस आहे. या ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी असला तरीही प्रत्यक्षातील सरासरी वेग ताशी ३२० किमी असेल. ५०८ किमीचे हे अंतर बुलेट ट्रेन दोन तासांत पूर्ण करेल, असा दावा करण्यात येत आहे. देशातील सर्वाधिक वेगवान गाड्यांमध्ये समावेश असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसमधून मुंबई ते अहमदाबाद अंतर पूर्ण करण्यासाठी किमान सात तास लागतात.
इंजिनचे मॉडेल प्रदर्शनात
वांद्रे येथे सुरू असलेल्या मॅग्नेट महाराष्ट्र प्रदर्शनात बुलेट ट्रेनच्या इंजिनाशी साम्य असणारे मॉडेल तयार केले आहे. जपानमध्ये धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी ई-५ मालिकेचे इंजिन वापरण्यात येते. त्यावर आधारित हे मॉडेल आहे. निविदा प्रक्रियेत जपानसाठी २० टक्के प्रमाण आरक्षित ठेवण्यात आले असून ८० टक्के भाग देश वा जागतिक स्तरावरील कंपन्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष इंजिन निर्मितीसाठी मेक इन इंडिया संकल्पना वापरताना जपानमधील तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले जाणार आहे.
अशी असेल बुलेट ट्रेन!
वेग-ताशी ३२० किमी
प्रकल्पपूर्तीचा काळ- सात वर्षे
५०८ किमीपैकी १२० किमीचा मार्ग महाराष्ट्रातून
तिकीट -२७०० ते ३ हजार रु.
१० डब्यांच्या बुलेट ट्रेनची प्रवासी क्षमता -७५०.
१२ पैकी चार स्थानके राज्यात
मार्ग- वांद्रे-कुर्ला, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरिया, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, अहमदाबाद, साबरमती
भागभांडवल- राज्य सरकारचे २० हजार कोटी रुपये
कर्ज-जपान सरकारकडून ०.१ टक्के व्याजाने ८८ हजार कोटी