म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोनामुळे विद्यार्थ्यांवरही अनिवार्य बंदचा ताण आला आहे. या काळात काही विद्यार्थी आपले उपजत छंद जोपासत आहेत तर काहींना सर्जनशीलतेची नव्याने ओळख झाली आहे. अशा गुणांना आणि छंदांना प्रोत्साहन देण्यासाठी फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्ह्यातर्फे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थांसाठीच आहे.
'बंदमधील माझा छंद' असा निबंधाचा विषय असून, शब्दमर्यादा २५० ते ३०० इतकी आहे. निबंध संगणकावर युनिकोड मराठी फॉण्टमध्ये पाठवावा. निबंधाची एमएसवर्ड किंवा पीडीएफ फाइल chandrashekhaegokhale@ymail.com या ईमेलवर पाठवावी. निबंधावर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक नमूद करावा. महाविद्यालयाचे नाव आणि महाविद्यालयाच्या प्रमाणित ओळखपत्राची सॉफ्ट प्रत सोबत पाठवणे अनिवार्य आहे, असे कोमसापच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर गोखले यांनी स्पष्ट केले आहे. हा निबंध ५ मे २०२० पर्यंत पाठवावा. प्रथम तीन विजेत्यांना ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रोख अशी बक्षिसे दिली जातील. ५०० रुपयांची चार उत्तेजनार्थ पारितोषिकेही आहेत. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल. त्याची माहिती व्हॉटसअॅप वा सोशल मीडियाद्वारे कळविण्यात येईल.