अ‍ॅपशहर

अर्थनियोजनावर पारंपरिक कल्पनांचा पगडा

समाजाची सामाजिक पत व समाजकारणावरील प्रभाव हा त्याच्या एक समाज म्हणून असणाऱ्या एकंदरीत आर्थिक प्रगतीवर अवलंबून असतो.

Maharashtra Times 27 Apr 2017, 4:00 am
अर्थसल्लागार जयंत विद्वांस यांची वसंत व्याख्यानमालेत खंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम concept of traditional concepts on finance planning
अर्थनियोजनावर पारंपरिक कल्पनांचा पगडा



म. टा. प्रतिनिधी, मुंबई

समाजाची सामाजिक पत व समाजकारणावरील प्रभाव हा त्याच्या एक समाज म्हणून असणाऱ्या एकंदरीत आर्थिक प्रगतीवर अवलंबून असतो. या दृष्टीने मराठी समाजाचा विचार केला असता पुढची पिढी शैक्षणिक प्रगतीची नवी शिखरे सर करीत असली तरी तिच्या अर्थनियोजनाबाबतच्या भूमिकेवर मात्र काही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कल्पनांचा पगडा दिसून येत असल्याची खंत अर्थसल्लागार जयंत विद्वांस यांनी नुकतीच वसंत व्याख्यानमालेत व्यक्त केली. त्यात बदल करण्यासाठी मुलांवर आतापासूनच त्यादृष्टीने संस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या व्याख्यानमालेचा मिडीया पार्टनर आहे.

अमर हिंद मंडळ, दादर आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या यंदाच्या ७०व्या पर्वामध्ये बोलताना अर्थसल्लगार विद्वांस यांनी वरील खंत व्यक्त केली. सध्याच्या प्रचंड स्पर्धात्मक, वेगवान आणि झपाट्याने बदलणाऱ्या जगात मूलभूत असणारा ‘आर्थिक साक्षरते’चा काहीसा अल्पपरिचित आणि क्लिष्ट भासणारा आयाम विद्वांस यांनी अत्यंत प्रवाही शैलीत श्रोत्यांना उलगडून सांगितला.

मराठी समाजात अजूनही व्यवसाय करणाऱ्या मुलास वर म्हणून पसंती देताना असणाऱ्या उदासीनतेकडे लक्ष वेधताना व्यावसायातदेखील सन्मार्गाने पैसे कमावता येतो हे समजून घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज बहुसंख्य महिलांनी शिक्षणाच्या जोरावर सर्व क्षेत्रात कमालीची प्रगती केली असली तरी अजून गुंतवणुकीबाबत काहीशी निरक्षरता दिसून येते व अज्ञानातून येणाऱ्या उदासीनतेमुळे महिला आर्थिक प्रगतीपासून वंचित राहतात, असे मत विद्वांस यांनी व्यक्त केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज