म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मागणीनुसार कन्फर्म आरक्षित तिकीट देण्याच्या आश्वासनापासून भारतीय रेल्वेने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हवे तेव्हा कन्फर्म तिकीट उपलब्ध होण्याची घोषणा मृगजळच ठरणार आहे. या आश्वासनाची पूर्तता शक्य नसून, मुळात मोदी सरकारच्या वतीने अशी घोषणाच करण्यात आली नसल्याचा दावा भारतीय रेल्वेतील उच्चपदस्थ सूत्रांनी केला आहे.
सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये २०२०पर्यंत मागणीनुसार आरक्षित रेल्वे तिकिटे उपलब्ध होतील, अशी घोषणा सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री असताना केली होती. पण, रेल्वेने असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचा दावा भारतीय रेल्वेतील सूत्रांनी केला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याविषयी सुरेश प्रभू यांच्याकडे विचारणाही केली आणि असे कोणतेही आश्वासन दिलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही निवडक गाड्यांमध्ये आकारण्यात येत असलेले ‘फ्लेक्सी फेअर’ मागे घेणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ‘फ्लेक्सी फेअर’मुळे रेल्वेचे उत्पन्न ५६२ कोटींनी वाढले असून, भारतीय रेल्वेच्या एकूण सुमारे २१ हजार प्रवासी रेल्वेगाड्यांपैकी केवळ १६८ रेल्वेगाड्यांमध्येच ‘फ्लेक्सी फेअर’ लागू करण्यात येत असल्यामुळे ही भाडेवाढ मागे घेण्याचा विचार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत रेल्वेचा उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. रेल्वेला शंभर रुपये कमावण्यासाठी १११ रुपये ५१ पैसे खर्च करावे लागत असून उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी मान्य केले. २०१८-१९च्या अर्थसंकल्पात एप्रिल ते जुलैदरम्यान मालवाहतुकीतून ३९ हजार २५३ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य रेल्वेने निर्धारित केले होते. पण, प्रत्यक्षात ३६ हजार ४८० कोटी रुपयांचेच उत्पन्न रेल्वेला कमावता आले. प्रवासी भाड्यातूनही रेल्वेला निर्धारित केलेले लक्ष्य गाठता आलेले नाही. प्रवासी भाड्यातून रेल्वेला १७ हजार ७३६ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात १७ हजार २७३ कोटी रुपयांचीच कमाई झाली आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मागणीनुसार कन्फर्म आरक्षित तिकीट देण्याच्या आश्वासनापासून भारतीय रेल्वेने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हवे तेव्हा कन्फर्म तिकीट उपलब्ध होण्याची घोषणा मृगजळच ठरणार आहे. या आश्वासनाची पूर्तता शक्य नसून, मुळात मोदी सरकारच्या वतीने अशी घोषणाच करण्यात आली नसल्याचा दावा भारतीय रेल्वेतील उच्चपदस्थ सूत्रांनी केला आहे.
सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांमध्ये २०२०पर्यंत मागणीनुसार आरक्षित रेल्वे तिकिटे उपलब्ध होतील, अशी घोषणा सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री असताना केली होती. पण, रेल्वेने असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचा दावा भारतीय रेल्वेतील सूत्रांनी केला आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याविषयी सुरेश प्रभू यांच्याकडे विचारणाही केली आणि असे कोणतेही आश्वासन दिलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही निवडक गाड्यांमध्ये आकारण्यात येत असलेले ‘फ्लेक्सी फेअर’ मागे घेणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ‘फ्लेक्सी फेअर’मुळे रेल्वेचे उत्पन्न ५६२ कोटींनी वाढले असून, भारतीय रेल्वेच्या एकूण सुमारे २१ हजार प्रवासी रेल्वेगाड्यांपैकी केवळ १६८ रेल्वेगाड्यांमध्येच ‘फ्लेक्सी फेअर’ लागू करण्यात येत असल्यामुळे ही भाडेवाढ मागे घेण्याचा विचार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत रेल्वेचा उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. रेल्वेला शंभर रुपये कमावण्यासाठी १११ रुपये ५१ पैसे खर्च करावे लागत असून उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी मान्य केले. २०१८-१९च्या अर्थसंकल्पात एप्रिल ते जुलैदरम्यान मालवाहतुकीतून ३९ हजार २५३ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे लक्ष्य रेल्वेने निर्धारित केले होते. पण, प्रत्यक्षात ३६ हजार ४८० कोटी रुपयांचेच उत्पन्न रेल्वेला कमावता आले. प्रवासी भाड्यातूनही रेल्वेला निर्धारित केलेले लक्ष्य गाठता आलेले नाही. प्रवासी भाड्यातून रेल्वेला १७ हजार ७३६ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात १७ हजार २७३ कोटी रुपयांचीच कमाई झाली आहे.