अ‍ॅपशहर

करोनावरून शिक्षक, पालकांमध्ये परीक्षांवरून गोंधळ

करोनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शाळा, कॉलेजांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र आदेशातील 'परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील,' या वाक्याचा फायदा घेऊन काही शाळांनी नववीची परीक्षा सुरू ठेवली. काही कॉलेजांनीही आपल्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असे स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या यंत्रणांकडून वेगवेगळ्या सूचना येत असल्यामुळे शिक्षक, पालक यांच्यात मात्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra Times 16 Mar 2020, 6:31 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: करोनाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शाळा, कॉलेजांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र आदेशातील 'परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील,' या वाक्याचा फायदा घेऊन काही शाळांनी नववीची परीक्षा सुरू ठेवली. काही कॉलेजांनीही आपल्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असे स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या यंत्रणांकडून वेगवेगळ्या सूचना येत असल्यामुळे शिक्षक, पालक यांच्यात मात्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम exam
file photo


सरकारने दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे आदेशात स्पष्ट केले होते. काही शाळांनी याचा अर्थ सर्वच परीक्षा वेळापत्रकानुसार घ्याव्यात, असा घेतला आहे. यामुळे सायन, सांताक्रूझ येथील काही शाळांनी नववीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा कालावधीत शाळेत बोलावले. मात्र ही सरकारी आदेशाची पायमल्ली असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

विद्यापीठाने सुरुवातीला कॉलेजांना सुटी जाहीर करत केवळ विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे म्हटले होते. मात्र पुन्हा सुधारित परिपत्रक काढत, कॉलेजांमध्ये केवळ अध्ययनाचे काम होणार नाही. मात्र परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडतील असे स्पष्ट केले. याचबरोबर विद्यापीठ तसेच कॉलेजांमधील प्रशासकीय कामकाजही नियमित सुरू राहील, असेही स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रातील यासर्व परिपत्रकांमुळे रविवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण राहिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज