अ‍ॅपशहर

अभिनंदन 'आर्ची'चं; त्रास उद्योगमंत्र्यांना!

'सैराट'मधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूच्या भूमिकेनं सध्या सगळ्यांनाच 'याड' लागलंय. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण या अभिनंदनाच्या कॉलमुळं राज्याचे उद्योगमंत्री चांगलेच त्रासले आहेत.

Maharashtra Times 9 May 2016, 6:36 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congratulatory calls for rinku rajguru but troubles minister subhash desai
अभिनंदन 'आर्ची'चं; त्रास उद्योगमंत्र्यांना!


'सैराट'मधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूच्या भूमिकेनं सध्या सगळ्यांनाच 'याड' लागलंय. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण या अभिनंदनाच्या कॉलमुळं राज्याचे उद्योगमंत्री चांगलेच त्रासले आहेत.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रिंकूला नुकतंच राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यामुळं सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियावर तर फक्त रिंकूचाच बोलबाला आहे. चाहते तर मोबाइलवर कॉल करून तिचे अभिनंदन करत आहेत. पण या अभिनंदनाच्या कॉलने उद्योगमंत्री सुभाष देसाई त्रस्त झाले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. रिंकूच्या वेबपेजवर देसाई यांचा मोबाईल नंबर झळकला आहे. त्यामुळं तिला येणारे अभिनंदनाचे कॉल थेट देसाई यांच्या मोबाइलवर जात आहेत. यामुळं त्यांना सारखं ''माफ करा हा चुकीचा नंबर आहे'', असं सांगावं लागतं. हा त्रास इतक्यावरच थांबत नाही, तर चाहत्यांकडून 'तुम्ही कोण बोलत आहात?', या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नालाही उत्तरं द्यावी लागत आहेत. दरम्यान, अशा प्रकारे येणारे कॉल थांबवण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली आहे, असं देसाई यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज