अ‍ॅपशहर

महाविकास आघाडी सरकारवर भाजपची काळी नजर आहे, पण...; काँग्रेसचा हल्लाबोल

राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडण्याचे दावे करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

Edited byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2022, 4:49 pm
मुंबई: भाजपने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला, परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात (Maha Vikas Aghadi Government) सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपची काळी नजर आहे, परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही. महाविकास आघाडी सरकार पूर्ण ५ वर्षे चालणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nana-Patole
नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल


वाचा: 'इन्स्टाग्राम'वर व्हिडिओ पोस्ट करून तरुण जंगलात निघून गेला आणि...

भंडारा येथे ते मीडियाशी बोलत होते. 'काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेलं आहे. मागील दोन वर्षांत करोनामुळं राज्य सरकारपुढं अनेक समस्यांचा डोंगर उभा होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढं किमान समान कार्यक्रम राबविला जाईल, असं पटोले म्हणाले. 'सरकारमधील तीनही पक्ष बरोबरीचे भागीदार आहेत आणि त्याचा विरोधकांना त्रास होत आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर व्हावं यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षानं केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून, राजभवनच्या मदतीनं सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. सत्ता नसल्यानं भाजपचा जीव कासावीस झाला आहे, परंतु महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून ५ वर्षांचा कार्यकाळ हे पूर्ण करेल, असंही ते ठामपणे म्हणाले.

वाचा: हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलार यांचा सवाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज