मुंबई: 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपाचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहावत नसून त्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत,' अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. (Nana Patole Slams BJP Over Pratap Sarnaik Allegations) केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही ते स्पष्ट झालं आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्यावरून विरोधकांवर दबाव आणण्याचं काम भाजप करत आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातूनही वारंवार उघड झालं आहे.
वाचा: भाजप हा कोणालाही त्रास न देणारा गरीब पक्ष - गिरीश बापट
'राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे, परंतु सत्ता नसल्यामुळं वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा कुटील डाव सुद्धा यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल,' असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.
वाचा: प्रताप सरनाईकांचे फोडाफोडीचे आरोप; राष्ट्रवादीनं सांगितला 'तो' नियम
'महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्यानं मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजप पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचं सरकार अस्थिर करण्याचं, विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु भाजपचं सत्तेचं दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असंही पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी-शिवसेना युतीला आमच्या शुभेच्छा!
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण भाजपविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही.'
वाचा: राज्यात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात नगरपासून? 'ही' निवडणूक ठरणार महत्त्वाची
वाचा: भाजप हा कोणालाही त्रास न देणारा गरीब पक्ष - गिरीश बापट
'राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे, परंतु सत्ता नसल्यामुळं वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा कुटील डाव सुद्धा यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल,' असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.
वाचा: प्रताप सरनाईकांचे फोडाफोडीचे आरोप; राष्ट्रवादीनं सांगितला 'तो' नियम
'महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्यानं मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजप पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचं सरकार अस्थिर करण्याचं, विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु भाजपचं सत्तेचं दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असंही पटोले म्हणाले.
राष्ट्रवादी-शिवसेना युतीला आमच्या शुभेच्छा!
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण भाजपविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही.'
वाचा: राज्यात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात नगरपासून? 'ही' निवडणूक ठरणार महत्त्वाची