मुंबई: केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली असून सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचपद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ( Naseem Khan Writes To Cm Uddhav Thackeray ) वाचा: मलिकांविरोधातील याचिकेवर येत्या सोमवारी हायकोर्टाचा निर्णय ; ज्ञानदेव वानखेडे म्हणतात...
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान यांनी सामान्यांना जो त्रास होत आहे त्याकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने मागील सात वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढवले. त्यामुळे आज हे दर प्रतिलिटर १०० रुपयांच्याही वर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. करोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे, असे नसीम खान यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाचा: समीर वानखेडेंनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवले; २० वर्षीय तरुणाचा जामीन अर्जात दावा
पेट्रोल डिझेलवरील कररूपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे परंतु, जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच राज्यातील जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाचा: हे कसं घडलं? अजित पवार, अण्णा हजारे एका व्यासपीठावर येणार
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान यांनी सामान्यांना जो त्रास होत आहे त्याकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने मागील सात वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढवले. त्यामुळे आज हे दर प्रतिलिटर १०० रुपयांच्याही वर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढून इतर वस्तुंच्या किमती वाढतात, प्रवासाचा खर्चही वाढतो. करोनामुळे आधीच लोकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. या दुष्टचक्रात सामान्य जनता भरडली जात असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे, असे नसीम खान यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाचा: समीर वानखेडेंनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवले; २० वर्षीय तरुणाचा जामीन अर्जात दावा
पेट्रोल डिझेलवरील कररूपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे परंतु, जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच राज्यातील जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाचा: हे कसं घडलं? अजित पवार, अण्णा हजारे एका व्यासपीठावर येणार