अ‍ॅपशहर

sachin sawant : प्यारे भारतवासियों; चौकीदाराला गुरू मानू नका; काँग्रेसच्या 'या' नेत्याचा टोला

गुरू पौर्णिमेचं (guru purnima) औचित्य साधून भाजपवर निशाना साधला आहे. प्यारे देशवासियो, आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी चौकीदाराला आपला गुरू मानू नका, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत (sachin sawant) यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2020, 12:22 pm
मुंबई: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरू पौर्णिमेचं औचित्य साधून भाजपवर निशाना साधला आहे. प्यारे देशवासियो, आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी चौकीदाराला आपला गुरू मानू नका, असं टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin sawant


आज गुरू पौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत असताना सचिन सावंत यांनी मात्र, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. देशावासियांनो, आज गुरू पौर्णिमा आहे. आज कृपया चौकीदाराल गुरू मानू नका. नाही तर कोट्यवधी रुपयांचे वस्त्र परिधान कराल, मौल्यवान आभुषणे अंगावर चढवाल आणि जन्मदात्या आईला मात्र रांगेत उभे कराल. आयुष्यभर खोटे बोलाल, जनतेची नेहमीच दिशाभूल कराल, द्वेष पसरवाल, गरीबांच्या तोंडातला घास हिसकावून घ्याल आणि अदानी-अंबानीची घरे भराल, असा टोला सावंत यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

सचिन सावंत यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. खास करून चीनच्या मुद्द्यावरून सावंत यांनी भाजपला अधिकच घेरले आहे. सहा वर्षे देश सुरक्षित हाती होता का? देशात डिजिटल असुरक्षा होती का? , टिकटॉकने ३० कोटी रुपये पीएम केअर फंडला दिले, हा क्रांतीचाच भाग होता का? माय गव्हर्नमेंट इंडिया ही साइट २० दिवसांपूर्वी टिकटॉकवर आणली गेली. त्यावेळीही डिजिटल सुरक्षा होती का? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पेटीएमचे काय झाले? असे सवाल सावंत यांनी केले आहे. मॅपात केलं पॅप, बंद करून चायनीज अॅप, अशी कोटी करत त्यांनी भाजपला टोलाही लगावला होता.


ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याच्या पैजा लागल्यानेच 'त्या' नियुक्त्या रखडल्या: राऊत

मोदी सरकारने चिनी अॅप बंद करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यावर सावंत यांनी हे सवाल केले होते. देश आता सुरक्षित हातांमध्ये आहे आणि भारताची डिजिटल सुरक्षा आता कोणीही ओलांडू शकत नाही. या क्रांतिकारक निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं मनपूर्वक आभार, असं पाटील म्हणाले होते. चीनविरुद्ध भारताने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशात टिकटॉकसह एकूण ५९ चिनी मोबाईल ॲपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून चीनने आपल्या तरुणांची दिशाभूल करण्यासाठी निर्माण केलेला घृणास्पद डाव आता यशस्वी होणार नाही, असंही पाटील यांनी म्हटलं होतं.

प्रिया बेर्डे राजकारणात; लवकरच होणार राष्ट्रवादीत प्रवेश

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज