सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने सेनेला पाठिंबा द्यावा: दलवाई
हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेश झाला असून सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा,अशी विनंती करणारे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठवले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याचीही आठवण दलवाई यांनी सोनिया गांधी यांना केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Nov 2019, 9:26 am
मुंबई: हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेश झाला असून सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा,अशी विनंती करणारे पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठवले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याचीही आठवण दलवाई यांनी सोनिया गांधी यांना केली आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये दोन मते असून सोनिया गांधी यांच्याशी यासंदर्भात होणाऱ्या चर्चेनंतरच काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे.
वाचा- पवार-ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा?; हालचालींना वेग
'भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा लागेल'
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दलवाई यांनी हे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर हे सरकार ५ वर्षे टिकेल असे प्रयत्न व्हायला पाहिजेत असेही दलवाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. एका खासगी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचेही हुसेन दलवाई यांनी अधोरेखित केले आहे. दरम्यान, काँग्रेसपक्षात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना हा हिंदुत्वाचे राजकारण करणारा पक्ष असून काँग्रेस पक्षाने राज्याच्या राजकारणात शिवसेनेला कायम विरोध दर्शवला आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता.
वाचा- उद्धव ठाकरे ते धाडस करतील?; राजधानीत चर्चा
तसेच, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेनं काँग्रेसला जो कौल दिला आहे, त्यानुसार काँग्रेस पक्ष विरोधी बाकावरच बसणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा किंवा कसे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. मात्र सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जायचे की नाही? याबाबत बोलण्यास काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार की नाही? याचे गुढ वाढले असले तरी, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन मते असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यावर सोनिया गांधी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा- सत्तेसाठी भाजप उतावीळ, वानखेडे स्टेडियम केला बुक
वाचा- पवार-ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा?; हालचालींना वेग
'भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा लागेल'
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दलवाई यांनी हे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर हे सरकार ५ वर्षे टिकेल असे प्रयत्न व्हायला पाहिजेत असेही दलवाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. एका खासगी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचेही हुसेन दलवाई यांनी अधोरेखित केले आहे. दरम्यान, काँग्रेसपक्षात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना हा हिंदुत्वाचे राजकारण करणारा पक्ष असून काँग्रेस पक्षाने राज्याच्या राजकारणात शिवसेनेला कायम विरोध दर्शवला आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता.
वाचा- उद्धव ठाकरे ते धाडस करतील?; राजधानीत चर्चा
तसेच, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेनं काँग्रेसला जो कौल दिला आहे, त्यानुसार काँग्रेस पक्ष विरोधी बाकावरच बसणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा किंवा कसे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. मात्र सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जायचे की नाही? याबाबत बोलण्यास काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार की नाही? याचे गुढ वाढले असले तरी, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन मते असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता यावर सोनिया गांधी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा- सत्तेसाठी भाजप उतावीळ, वानखेडे स्टेडियम केला बुक