मुंबई: रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोट येथे भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली?, त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्यांनी स्वतः सांगितले आहे की ज्याने त्यांना ही माहिती दिली ती मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अर्णब गोस्वामी यांचे कृत्य हे ऑफिस सीक्रेट अॅक्ट नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचाही प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामी यांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आज अर्णब यांच्याविरोधात रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. ( Arnab Goswami Leaked Chat Latest Update )
वाचा: कंगनाला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स; आता 'या' प्रकरणात होणार चौकशी
अर्णब गोस्वामी यांना देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली? त्यांनी ती माहिती आणखी किती लोकांना दिली? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्णब गोस्वामी यांना गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्ये केली असून दूरदर्शनची सॅटेलाइट फ्रीक्वेन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसै न देता त्यांच्या फ्रीक्वेन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शनने तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ मोदी सरकारचा अर्णब गोस्वामी यांना पाठिंबा आहे व त्यामुळेच जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्णब गोस्वामीविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई केली नाही, असा संशय बळावतो, असेही थोरात यांनी नमूद केले आहे.
वाचा: 'अर्णव गोस्वामीच्या देशद्रोहाबद्दल भाजपवाले तांडव का करत नाहीत?'
दासगुप्ता व अर्णब यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून अर्णब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्यांना नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यासोबतच पुलवामातील हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे. तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्णब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे ही माध्यम स्वातंत्र्य, देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. या सर्व प्रकरणात एकटे अर्णब गोस्वामीच दोषी नाहीत तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्रीही दोषी आहेत. त्यांनी पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करून गोस्वामी यांचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्यांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गोस्वामी यांना मदत करणाऱ्या उच्चपदस्थांवरदेखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.
वाचा: 'सीरम'च्या आगीमागे घातपाताची शक्यता!; गुप्तचर यंत्रणा घेताहेत शोध
वाचा: कंगनाला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स; आता 'या' प्रकरणात होणार चौकशी
अर्णब गोस्वामी यांना देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली? त्यांनी ती माहिती आणखी किती लोकांना दिली? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्णब गोस्वामी यांना गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्ये केली असून दूरदर्शनची सॅटेलाइट फ्रीक्वेन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसै न देता त्यांच्या फ्रीक्वेन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शनने तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ मोदी सरकारचा अर्णब गोस्वामी यांना पाठिंबा आहे व त्यामुळेच जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्णब गोस्वामीविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई केली नाही, असा संशय बळावतो, असेही थोरात यांनी नमूद केले आहे.
वाचा: 'अर्णव गोस्वामीच्या देशद्रोहाबद्दल भाजपवाले तांडव का करत नाहीत?'
दासगुप्ता व अर्णब यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून अर्णब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्यांना नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यासोबतच पुलवामातील हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे. तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्णब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे ही माध्यम स्वातंत्र्य, देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. या सर्व प्रकरणात एकटे अर्णब गोस्वामीच दोषी नाहीत तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्रीही दोषी आहेत. त्यांनी पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करून गोस्वामी यांचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्यांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गोस्वामी यांना मदत करणाऱ्या उच्चपदस्थांवरदेखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.
वाचा: 'सीरम'च्या आगीमागे घातपाताची शक्यता!; गुप्तचर यंत्रणा घेताहेत शोध