म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये खासगीकरणाचा कल वाढू लागला असताना, तसेच अनेक विभागात कंत्राटी संचालक नेमल्यानंतर आता आपत्कालीन व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विभागासाठीही बाहेरून संचालक नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पालिकेने मागील काही वर्षांत माध्यम सल्लागार, माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय विभाग, आयटी अॅनालायटिक विभागात कंत्राटी पद्धतीने संचालक नेमले आहेत. त्यानंतर आता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक पदही याच पद्धतीने भरले जाणार आहे. या विभागाचे संचालक महेश नार्वेकर हे मागील वर्षी सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या अभ्यासू आणि कार्यतत्पर कामामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत ३० ऑक्टोबरला संपत आहे.
तत्पूर्वी या पदावर नवीन उमेदवार नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन हा पालिकेतील महत्त्वाचा विभाग असून इमारत कोसळणे, पाऊस, आग यासह अनेक नैसर्गिक आपत्ती तसेच सध्याच्या करोना काळात खाटा आणि रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचे काम या विभागातर्फे केले जाते. त्यामुळे तितक्या सक्षम उमेदवाराच्या शोधात पालिका आहे. उमेदवारासाठी ३८ वर्ष वयाची अट असून आपत्ती व्यवस्थापनाची पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य?
आपत्कालीन व्यवस्थापन विभाग मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने या विभागाच्या संचालकपदी अनुभव आणि वयोमर्यादेत बसत असल्यास शक्यतो पालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये खासगीकरणाचा कल वाढू लागला असताना, तसेच अनेक विभागात कंत्राटी संचालक नेमल्यानंतर आता आपत्कालीन व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विभागासाठीही बाहेरून संचालक नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पालिकेने मागील काही वर्षांत माध्यम सल्लागार, माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय विभाग, आयटी अॅनालायटिक विभागात कंत्राटी पद्धतीने संचालक नेमले आहेत. त्यानंतर आता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक पदही याच पद्धतीने भरले जाणार आहे. या विभागाचे संचालक महेश नार्वेकर हे मागील वर्षी सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या अभ्यासू आणि कार्यतत्पर कामामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत ३० ऑक्टोबरला संपत आहे.
तत्पूर्वी या पदावर नवीन उमेदवार नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन हा पालिकेतील महत्त्वाचा विभाग असून इमारत कोसळणे, पाऊस, आग यासह अनेक नैसर्गिक आपत्ती तसेच सध्याच्या करोना काळात खाटा आणि रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचे काम या विभागातर्फे केले जाते. त्यामुळे तितक्या सक्षम उमेदवाराच्या शोधात पालिका आहे. उमेदवारासाठी ३८ वर्ष वयाची अट असून आपत्ती व्यवस्थापनाची पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य?
आपत्कालीन व्यवस्थापन विभाग मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने या विभागाच्या संचालकपदी अनुभव आणि वयोमर्यादेत बसत असल्यास शक्यतो पालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.