म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापीठच्या कला शाखा तृतीय वर्ष अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कवितेमध्ये आदिवासी महिलांबद्दल काही अश्लील मजकूर देण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठावर धडक दिली होती. यानंतर, शनिवारी याचे पडसाद ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये उमटले. या सर्वाची दखल घेऊन विद्यापीठाने शनिवारी तातडीने मराठी विभागच्या अभ्यास मंडळाची बैठक बोलावून ही कविता रद्द करण्याचा निर्णय घेतला. या कवितेवर परीक्षेत कोणताही प्रश्न येणार नाही, असेही विद्यापीठाने जाहीर केले आहे.
कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात दीनकर मनवर यांची ‘पाणी कसं अस्तं’ ही कविता देण्यात आली आहे. या कवितेमध्ये पाण्याचे वर्णन करत असताना आदिवासी महिलेच्या शरीराशी तुलना करण्यात आली आहे. ही बाब अक्षेपार्ह असून विद्यापीठाने ही कविता नेमकी काय विचार करून अभ्यासक्रमात घेतली याचा खुलासा करावा, अशी मागणी छात्र भारतीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी केली होती. युवासेनेनेही याची दखल घेत विद्यापीठाला निवेदन दिले होते.
‘गुन्हा दाखल व्हावा’
दरम्यान, या प्रकरणी आदिवासी युवतीच्या सन्मानार्थ श्रमजीवी संघटनेने ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांत आंदोलने केली. तसेच, सर्व तहसीलदारांना निवेदन देऊन मनवर यावर कारवाई करण्याची मागणी करत ही कविता प्रकाशित करणारे आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणारे आशा सर्व दोषींना आरोपी करण्याची मागणीही श्रमजीवीने केली. प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात मनवर, प्रकाशक, आणि विद्यापीठाच्या अभ्याक्रमात कविता समाविष्ट करणारे सर्व संबंधित जबाबदार यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद केली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी दिली.
मुंबई विद्यापीठच्या कला शाखा तृतीय वर्ष अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कवितेमध्ये आदिवासी महिलांबद्दल काही अश्लील मजकूर देण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठावर धडक दिली होती. यानंतर, शनिवारी याचे पडसाद ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये उमटले. या सर्वाची दखल घेऊन विद्यापीठाने शनिवारी तातडीने मराठी विभागच्या अभ्यास मंडळाची बैठक बोलावून ही कविता रद्द करण्याचा निर्णय घेतला. या कवितेवर परीक्षेत कोणताही प्रश्न येणार नाही, असेही विद्यापीठाने जाहीर केले आहे.
कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात दीनकर मनवर यांची ‘पाणी कसं अस्तं’ ही कविता देण्यात आली आहे. या कवितेमध्ये पाण्याचे वर्णन करत असताना आदिवासी महिलेच्या शरीराशी तुलना करण्यात आली आहे. ही बाब अक्षेपार्ह असून विद्यापीठाने ही कविता नेमकी काय विचार करून अभ्यासक्रमात घेतली याचा खुलासा करावा, अशी मागणी छात्र भारतीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी केली होती. युवासेनेनेही याची दखल घेत विद्यापीठाला निवेदन दिले होते.
‘गुन्हा दाखल व्हावा’
दरम्यान, या प्रकरणी आदिवासी युवतीच्या सन्मानार्थ श्रमजीवी संघटनेने ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांत आंदोलने केली. तसेच, सर्व तहसीलदारांना निवेदन देऊन मनवर यावर कारवाई करण्याची मागणी करत ही कविता प्रकाशित करणारे आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणारे आशा सर्व दोषींना आरोपी करण्याची मागणीही श्रमजीवीने केली. प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात मनवर, प्रकाशक, आणि विद्यापीठाच्या अभ्याक्रमात कविता समाविष्ट करणारे सर्व संबंधित जबाबदार यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद केली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी दिली.