मुंबई: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'करोना' व्हायरसच्या संकटाच्या काळात चांगले काम करत आहेत. मुंबई व महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सातत्यानं प्रयत्न करत आहेत. लोकांना काळजी घेण्याच्या सूचना देत आहेत. त्यांचे मी आभार मानतो,' अशा शब्दांत भाजपच्या मित्रपक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
Live: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २०३ वर
'करोना'च्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी आज 'मटा ऑनलाइन'शी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या कामाचं त्यांनी मनमोकळेपणानं कौतुक केलं. त्याचवेळी, सरकारला काही सूचनाही केल्या. 'राज्यावर एखादे मोठे संकट आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील विरोधी पक्ष आणि इतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेण्याची परंपरा आहे. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत तशी बैठक बोलवायला हवी होती. येत्या काळात ते बैठक बोलावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
'करोना'च्या महासंकटाचा एकजुटीने मुकाबला करण्यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि माझ्यासह माझा रिपब्लिकन पक्ष आम्ही सगळे सरकारला सहकार्य करत आहोत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल आणि मी स्वत: केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एखादी बैठक आयोजित करावी,' असं ते म्हणाले.
रामदास आठवले यांनी यावेळी आपल्या खास काव्यमय शैलीत लोकांना संदेशही दिला. ते म्हणाले,
'कोई ना निकले रोड पर... मै बिनती करता हू आपको हात जोडकर...
घरमें रहकर साफ रखो अपना घर... फिर करोना से हमें बिल्कुल नही होगा डर...
करोना का हमें किल्ला करना है सर... इसलिए कोई ना आये रोडपर
...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित पवार
Live: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २०३ वर
'करोना'च्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी आज 'मटा ऑनलाइन'शी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या कामाचं त्यांनी मनमोकळेपणानं कौतुक केलं. त्याचवेळी, सरकारला काही सूचनाही केल्या. 'राज्यावर एखादे मोठे संकट आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील विरोधी पक्ष आणि इतर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेण्याची परंपरा आहे. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत तशी बैठक बोलवायला हवी होती. येत्या काळात ते बैठक बोलावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कठोर निर्णयास भाग पाडू नका; मुख्यमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा
'करोना'च्या महासंकटाचा एकजुटीने मुकाबला करण्यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि माझ्यासह माझा रिपब्लिकन पक्ष आम्ही सगळे सरकारला सहकार्य करत आहोत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल आणि मी स्वत: केंद्राकडून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एखादी बैठक आयोजित करावी,' असं ते म्हणाले.
रामदास आठवले यांनी यावेळी आपल्या खास काव्यमय शैलीत लोकांना संदेशही दिला. ते म्हणाले,
'कोई ना निकले रोड पर... मै बिनती करता हू आपको हात जोडकर...
घरमें रहकर साफ रखो अपना घर... फिर करोना से हमें बिल्कुल नही होगा डर...
करोना का हमें किल्ला करना है सर... इसलिए कोई ना आये रोडपर
...तर आजही आपण राज्याला वाचवू शकतो: अजित पवार