म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोनाविरुद्धच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार, तसेच महापालिका करत असली, तरीही राज्यातील तृतीयपंथींना मात्र लसीकरणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कागदपत्रांच्या अभावी, कधी अॅपमध्ये नोंदणी न करता आल्यामुळे, मोबाइल नसल्यामुळेही राज्यातील तृतीयपंथींना लसीकरणाची सुविधा अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, या घटकाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या प्रिया पाटील यांनी, सरकारने तृतीयपंथीयांची समस्या लक्षात घ्यावी. आजच्या घडीला राज्यात मोठ्या प्रमाणात ४५ वयोगटावरील तृतीयपंथी आहेत. त्यांच्यापैकी किती जणांना करोना झाला, या संसर्गामुळे किती जणांचा मृत्यू झाला, याचा विशेषत्वाने अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
विमल भांडुप येथे राहते. मिळेल ते काम करून ती पोट भरते. लसीकरण केले का, अशी विचारणा केल्यानंतर कोविनमध्ये नोंदणी कशी करायची वा लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची याची माहिती नसल्याचे तिने सांगितले. ती ज्यांच्याकडे कामाला जाते, त्यांनी लसीकरण करून देतो, असे सांगितले होते. पण, पुढे काहीही झाले नाही. मीरारोड येथे राहणाऱ्या सुप्रियाने सांगितले की, लसीकरण करून घेण्याचा विचार अद्याप तिने केलेला नाही. लस घेतल्यानंतर त्याचे तृतीयपंथींमध्ये कोणत्या स्वरूपाचे दुष्परिणाम होतात, याची माहिती तिला हवी आहे. मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत लसीकरण करून घेणार नाही, असे ती म्हणाली. यासंदर्भात सरकारकडे निवेदन देणार असल्याचे प्रिया पाटील यांनी 'मटा'ला सांगितले.
आरोग्य व्यवस्थेमध्ये तृतीयपंथींच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अनेक रुग्णालयांमध्ये आम्हाला स्त्रियांचा की पुरुषांच्या वॉर्डमध्ये वैद्यकीय उपचार द्यायचे यावर संभ्रम असतो. त्यातून वैद्यकीय सेवा नाकारली जाते. करोना संसर्गाची भीती या गटामध्ये इतकी आहे की, ज्यांना करोनाचा संसर्ग झाला त्यांनी त्यांची नोंदही केली असण्याची शक्यता नाही. त्यामुळे लसीकरणाच्या संदर्भातही वैद्यकीय यंत्रणांनी पुढाकार घेऊन या समूहाच्या वस्त्यांच्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करायला हवे, अशी गरज तृतीयपंथींच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मेघन पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली.
हार्मोनल थेरपीसाठीही अडचणी
अनेक तृतीयपंथी हार्मोनल थेरपी घेतात. बहुसंख्य रुग्णालयांचे रूपांतर कोविडमध्ये झाल्यामुळे हे वैद्यकीय उपचार दीर्घकाळासाठी मिळत नव्हते. इतर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठीही वैद्यकीय उपचारासाठी तृतीयपंथींना करोनाकाळमध्ये खूप झगडावे लागल्याचा अनुभव पाटील यांनी सांगितला.
करोनाविरुद्धच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार, तसेच महापालिका करत असली, तरीही राज्यातील तृतीयपंथींना मात्र लसीकरणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कागदपत्रांच्या अभावी, कधी अॅपमध्ये नोंदणी न करता आल्यामुळे, मोबाइल नसल्यामुळेही राज्यातील तृतीयपंथींना लसीकरणाची सुविधा अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, या घटकाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या प्रिया पाटील यांनी, सरकारने तृतीयपंथीयांची समस्या लक्षात घ्यावी. आजच्या घडीला राज्यात मोठ्या प्रमाणात ४५ वयोगटावरील तृतीयपंथी आहेत. त्यांच्यापैकी किती जणांना करोना झाला, या संसर्गामुळे किती जणांचा मृत्यू झाला, याचा विशेषत्वाने अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
विमल भांडुप येथे राहते. मिळेल ते काम करून ती पोट भरते. लसीकरण केले का, अशी विचारणा केल्यानंतर कोविनमध्ये नोंदणी कशी करायची वा लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची याची माहिती नसल्याचे तिने सांगितले. ती ज्यांच्याकडे कामाला जाते, त्यांनी लसीकरण करून देतो, असे सांगितले होते. पण, पुढे काहीही झाले नाही. मीरारोड येथे राहणाऱ्या सुप्रियाने सांगितले की, लसीकरण करून घेण्याचा विचार अद्याप तिने केलेला नाही. लस घेतल्यानंतर त्याचे तृतीयपंथींमध्ये कोणत्या स्वरूपाचे दुष्परिणाम होतात, याची माहिती तिला हवी आहे. मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत लसीकरण करून घेणार नाही, असे ती म्हणाली. यासंदर्भात सरकारकडे निवेदन देणार असल्याचे प्रिया पाटील यांनी 'मटा'ला सांगितले.
आरोग्य व्यवस्थेमध्ये तृतीयपंथींच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अनेक रुग्णालयांमध्ये आम्हाला स्त्रियांचा की पुरुषांच्या वॉर्डमध्ये वैद्यकीय उपचार द्यायचे यावर संभ्रम असतो. त्यातून वैद्यकीय सेवा नाकारली जाते. करोना संसर्गाची भीती या गटामध्ये इतकी आहे की, ज्यांना करोनाचा संसर्ग झाला त्यांनी त्यांची नोंदही केली असण्याची शक्यता नाही. त्यामुळे लसीकरणाच्या संदर्भातही वैद्यकीय यंत्रणांनी पुढाकार घेऊन या समूहाच्या वस्त्यांच्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करायला हवे, अशी गरज तृतीयपंथींच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मेघन पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केली.
हार्मोनल थेरपीसाठीही अडचणी
अनेक तृतीयपंथी हार्मोनल थेरपी घेतात. बहुसंख्य रुग्णालयांचे रूपांतर कोविडमध्ये झाल्यामुळे हे वैद्यकीय उपचार दीर्घकाळासाठी मिळत नव्हते. इतर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठीही वैद्यकीय उपचारासाठी तृतीयपंथींना करोनाकाळमध्ये खूप झगडावे लागल्याचा अनुभव पाटील यांनी सांगितला.