मुंबई: कालपर्यंत मुंबई महापालिकेत कार्यरत असलेले पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता शिरीष दीक्षित यांचं काल रात्री माहीम येथील राहत्या घरी अचानक निधन झालं. दीक्षित यांचा काल दुपारी करोना रिपोर्ट आला होता. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर रात्री अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने पालिकेत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दीक्षित यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात प्रमुख अभियंता म्हणून काम करणारे शिरीष दीक्षित यांच्याकडे पालिकेच्या उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी)पदाचीही जबाबदारी होती. दीक्षित यांच्यात करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट काल आला. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. कालपर्यंत पालिकेत रोज कार्यरत असलेले दीक्षित संध्याकाळी घरी गेल्यानंतर रात्री ८च्या सुमारास त्यांचं अचानक निधन झालं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही. अभियांत्रिकी क्षेत्राची सखोल जाण असणारे, मितभाषी व निगर्वी स्वभावाचे दीक्षित हे महापालिका कर्मचारी व अभियंत्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने महापालिका प्रशासनाने आपला एक कुशल अभियंता गमावला आहे. दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
सन १९८७ मध्ये ‘दुय्यम अभियंता’ (सब इंजिनिअर) या पदावर रुजू होत, त्यांनी आपल्या महापालिका सेवेची सुरुवात केली होती. आपल्या महापालिकेतील सेवा कारकिर्दी दरम्यान पाणीपुरवठा विषयक अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘कोरोना कोविड-१९’ च्या अनुषंगाने अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी येथील एन. एस. सी. आय. येथे उभारण्यात आलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ आणि ‘रेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण केंद्रांच्या उभारणीत दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर तिथे वेळोवेळी अभियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्यातही त्यांचा पुढाकार होता.
...तर आपण पुन्हा उभं राहू; शरद पवारांनी दिला कोकणवासियांना धीर
‘कोरोना कोविड-१९’ बाबत घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई शहराला अविरत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी मनुष्यबळ संख्येचे आव्हान असतानाही त्यांनी समर्थपणे पार पाडली. अत्यंत मितभाषी असलेले दीक्षित हे अभियांत्रिकी कौशल्यात निष्णात व पारंगत होते. पाणीपुरवठा प्रकल्पांपैकी, मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत असणाऱ्या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रिया केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंतचा तब्बल १५ किलोमीटर लांबीचा जलबोगदा करण्यात आणि गारगाई प्रकल्पाला गती देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
राहुल गांधींचा देशाच्या लष्करावर विश्वास नाही का?, रिजिजूंचा सवाल
'मुख्यमंत्री रोज टापटीप असतात, ते केस कुठं कापतात?'
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात प्रमुख अभियंता म्हणून काम करणारे शिरीष दीक्षित यांच्याकडे पालिकेच्या उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी)पदाचीही जबाबदारी होती. दीक्षित यांच्यात करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट काल आला. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. कालपर्यंत पालिकेत रोज कार्यरत असलेले दीक्षित संध्याकाळी घरी गेल्यानंतर रात्री ८च्या सुमारास त्यांचं अचानक निधन झालं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही. अभियांत्रिकी क्षेत्राची सखोल जाण असणारे, मितभाषी व निगर्वी स्वभावाचे दीक्षित हे महापालिका कर्मचारी व अभियंत्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने महापालिका प्रशासनाने आपला एक कुशल अभियंता गमावला आहे. दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
सन १९८७ मध्ये ‘दुय्यम अभियंता’ (सब इंजिनिअर) या पदावर रुजू होत, त्यांनी आपल्या महापालिका सेवेची सुरुवात केली होती. आपल्या महापालिकेतील सेवा कारकिर्दी दरम्यान पाणीपुरवठा विषयक अनेक महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘कोरोना कोविड-१९’ च्या अनुषंगाने अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी येथील एन. एस. सी. आय. येथे उभारण्यात आलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ आणि ‘रेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना अलगीकरण केंद्रांच्या उभारणीत दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर तिथे वेळोवेळी अभियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्यातही त्यांचा पुढाकार होता.
...तर आपण पुन्हा उभं राहू; शरद पवारांनी दिला कोकणवासियांना धीर
‘कोरोना कोविड-१९’ बाबत घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई शहराला अविरत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी मनुष्यबळ संख्येचे आव्हान असतानाही त्यांनी समर्थपणे पार पाडली. अत्यंत मितभाषी असलेले दीक्षित हे अभियांत्रिकी कौशल्यात निष्णात व पारंगत होते. पाणीपुरवठा प्रकल्पांपैकी, मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत असणाऱ्या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रिया केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्प यासारखे अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंतचा तब्बल १५ किलोमीटर लांबीचा जलबोगदा करण्यात आणि गारगाई प्रकल्पाला गती देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
राहुल गांधींचा देशाच्या लष्करावर विश्वास नाही का?, रिजिजूंचा सवाल
'मुख्यमंत्री रोज टापटीप असतात, ते केस कुठं कापतात?'