अ‍ॅपशहर

'तबलिगी जमात'च्या कार्यक्रमावरून गृहमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी का दिली? असा सवाल करत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या कार्यक्रमातून करोनाचा फैलाव होण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाला का जबाबदार धरू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2020, 6:49 pm
मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजधानी दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाद्वारे करोना विषाणूचा फैलाव होण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाला जबाबदार का धरलं जाऊ नये, असा सवाल त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil deshmukh


ज्यावेळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान रात्री दोन वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी जमातचे नेता मौलाना साद यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्यात अशी कोणती 'गुप्त' चर्चा झाली, असा सवालही गृहमंत्री देशमुख यांनी केला आहे. डोवल यांना रात्री उशिरा साद यांची भेट घेण्यासाठी कुणी पाठवलं होतं? जमातच्या सदस्यांशी संपर्क करण्याचे काम एनएसएचा होता की दिल्ली पोलीस आयुक्तांचा? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

राज्यपालांबद्दल शरद पवारांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार

व्हिडिओः पुणे पोलिसांचा 'रूट' मार्च

जमातच्या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला. तसंच अनेक प्रश्नही उपस्थित करतानाच, जमातशी सरकारचे लागेबांधे असल्याचा आरोपही केला. मरकजजवळच निजामुद्दीन पोलीस ठाणे असूनही कार्यक्रम रोखता आला नाही. केंद्रीय गृहमंत्रालयानं दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी का दिली, असा सवालही देशमुख यांनी केला.

कल्याण-डोंबिवलीत आणखी तिघांना करोना

शरद पवारांचा केंद्राला आर्थिक बचतीचा सल्ला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज