अ‍ॅपशहर

..तर लॉकडाऊन उठवणं शक्य होईल का?: राजेश टोपे

राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची टिप्पणी केली आहे. स्वयंशिस्त पाळा, तसंच गर्दी टाळा; अन्यथा १५ एप्रिलला लॉकडाऊन उठवणं शक्य होईल का, याचा विचार सर्वांनी करावा, असं टोपे म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2020, 3:24 pm
मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत सर्वांनीच स्वयंशिस्त पाळायला हवी. गर्दी टाळलीच पाहिजे. असं झालं नाही तर १५ एप्रिलला लॉकडाऊन उठवणं शक्य होईल का? याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajesh tope


जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. 'आरोग्यासारखी दुसरी धनसंपदा नाही. त्यामुळे सर्वांनी व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि शरीर सुदृढ व निरोगी ठेवा. उद्या हनुमान जयंती व शब-ए-बरात आहे. या सणांनिमित्त सर्वांनी घरूनच आपली श्रद्धा व भावना व्यक्त करा, कोणीही घराबाहेर पडू नका,' अशी विनंतीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली.

'१४ एप्रिलनंतर लोक घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत'

मुंबईत तबलिगी जमातच्या १५०जणांवर गुन्हे

जागतिक आरोग्य संघटनेनं 'सपोर्ट नर्सेस आणि मिडवाईव्ह्ज' ही संकल्पना मांडली आहे. यंदा जागतिक आरोग्य दिनाला करोनाची पार्श्वभूमी असल्याने हे संकट टळावे, सर्वजण निरोगी व सुदृढ राहावेत, ही सदिच्छा व्यक्त करतानाच, आरोग्यमंत्री टोपे यांनी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

'मातोश्री' परिसरात करोनाचा रुग्ण; मंत्री म्हणाले...

पाहाः करोनाबाबतच्या अफवा आणि तथ्य

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज