मुंबई: करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमबजावणी आवश्यक आहे व त्यासाठी मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे, अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्याचे मुंबई पोलिसांनी खंडन केले आहे. मुंबईत असे काहीही होणार नाही, असे मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजाराच्यावर गेली आहे. मुंबईत लॉकडाऊन आणि संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस अहोरात्र पहारा देत आहेत. त्यात आतापर्यंत २३३ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे तर तीन पोलिसांना जीवही गमवावा लागला आहे. या स्थितीत कोणतीही खातरजमा न करता चुकीची माहिती सोशल माध्यमातून पसरवली जात असल्याने त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.
‘लॉकडाउन’चा एक्झिट प्लॅन जाहीर करावा
लॉकडाऊन असल्याने बहुसंख्य मुंबईकर सध्या घरातच आहेत. त्यावरूनच मुंबई पोलिसांनी फावल्या वेळेत अफवा पसरवण्याचे काम करणाऱ्यांना फैलावर घेतले आहे. 'सध्या तुमच्याकडे मोकळा वेळ बराच आहे, हे आम्हाला माहीत आहे. मात्र, हा वेळ अफवा पसरवण्यावर खर्ची घालण्यापेक्षा सत्कारणी लावा. काही चांगल्या गोष्टी करा', असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. आता जीवनावश्यक वस्तूची दुकानेही बंद होणार, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा, मुंबईत लष्कराला किंवा निमलष्करी दलाला पाचारण करण्यात येणार आहे, या साऱ्या निव्वळ अफवा आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही फक्त शांतपणे घरात राहा. करोनाविरुद्धच्या लढाईत त्याचीच जास्त आवश्यकता आहे', असेही मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊन आणखी कठोर करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाला बोलावण्यात येणार आहे, अशा जोरदार अफवा पसरल्या होत्या. ते लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी हे ट्विट केले आहे. दुसरीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही गुरुवारी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना मार्गदर्शन केले व पोलिसांचे मनोबल वाढवले. मुंबई पोलिसांनी अनेक आव्हाने याआधी पेललेली आहेत आणि आता करोनाविरुद्धचं युद्धही आपणच जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. मुंबई पोलीस कोणतेही आव्हान पेलण्यास सक्षम आहेत, असा संदेशच आयुक्तांनी या निमित्ताने दिला होता. जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील २६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त तिथे गेले होते.
स्थलांतरितांसाठी भरारी पथक नेमा; शरद पवारांची सूचना
मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजाराच्यावर गेली आहे. मुंबईत लॉकडाऊन आणि संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस अहोरात्र पहारा देत आहेत. त्यात आतापर्यंत २३३ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे तर तीन पोलिसांना जीवही गमवावा लागला आहे. या स्थितीत कोणतीही खातरजमा न करता चुकीची माहिती सोशल माध्यमातून पसरवली जात असल्याने त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.
‘लॉकडाउन’चा एक्झिट प्लॅन जाहीर करावा
लॉकडाऊन असल्याने बहुसंख्य मुंबईकर सध्या घरातच आहेत. त्यावरूनच मुंबई पोलिसांनी फावल्या वेळेत अफवा पसरवण्याचे काम करणाऱ्यांना फैलावर घेतले आहे. 'सध्या तुमच्याकडे मोकळा वेळ बराच आहे, हे आम्हाला माहीत आहे. मात्र, हा वेळ अफवा पसरवण्यावर खर्ची घालण्यापेक्षा सत्कारणी लावा. काही चांगल्या गोष्टी करा', असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. आता जीवनावश्यक वस्तूची दुकानेही बंद होणार, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा, मुंबईत लष्कराला किंवा निमलष्करी दलाला पाचारण करण्यात येणार आहे, या साऱ्या निव्वळ अफवा आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही फक्त शांतपणे घरात राहा. करोनाविरुद्धच्या लढाईत त्याचीच जास्त आवश्यकता आहे', असेही मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊन आणखी कठोर करण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाला बोलावण्यात येणार आहे, अशा जोरदार अफवा पसरल्या होत्या. ते लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी हे ट्विट केले आहे. दुसरीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही गुरुवारी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना मार्गदर्शन केले व पोलिसांचे मनोबल वाढवले. मुंबई पोलिसांनी अनेक आव्हाने याआधी पेललेली आहेत आणि आता करोनाविरुद्धचं युद्धही आपणच जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. मुंबई पोलीस कोणतेही आव्हान पेलण्यास सक्षम आहेत, असा संदेशच आयुक्तांनी या निमित्ताने दिला होता. जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील २६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त तिथे गेले होते.
स्थलांतरितांसाठी भरारी पथक नेमा; शरद पवारांची सूचना