अ‍ॅपशहर

दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला; ३१ मार्चनंतर निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पुढे ढकलण्यात आलेला पेपरच्या तारखेची घोषणा ३१ मार्चनंतर करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2020, 2:48 pm
मुंबई: इयत्ता दहावी परीक्षेचा सोमवारी, २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. त्या पेपरची पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज, शनिवारी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम varsha gaikwad


राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि विविध खात्यांमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील सद्यपरिस्थिती पाहता, अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता दहावीचा शेवटचा पेपरही पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. २३ जानेवारीला होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला असून, त्याच्या तारखेची घोषणा ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.


Live: मध्य रेल्वेचा उद्याचा मेगाब्लॉक रद्द

करोना: शरद पवार मैदानात; केंद्रीय मंत्र्यांना फोन

करोनाचं महाभयंकर संकट रोखण्यासाठी राज्य सरकारनं मोठ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही मोठी शहरे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.

बळाचा वापर करायला लावू नका; मुंढेंची ताकीद

मुंबईकरांनो, घरातच राहा! उद्या मेट्रो दिवसभर बंद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज