म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही ( covid vaccine booster dose maharashtra ) मात्रांच्या पूर्ण लसीकरणासह आता बूस्टर मात्रा घेण्याचा आग्रह व्यक्त केला जातो आहे. तरीही राज्यामध्ये साठ वर्ष वयोगटातील अवघ्या ३५ टक्के लाभार्थ्यांनी बूस्टर घेतली आहे. एकूण लोकसंख्येपैकी कमीतकमी एक मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८८.९१ टक्के असून दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण ७०.६८ टक्के आहे.
काही देशांमध्ये करोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहे ते लक्षात घेऊन राज्य सरकारनेही आता रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी काही वैद्यकीय खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात राज्याच्या कोणत्या भागामध्ये रुग्णसंख्या वाढती आहे, याकडे लक्ष देण्याच्याही सूचना आहे. शहरी- ग्रामीण तसेच जिल्हापातळीसह शहरामध्ये अधिक गर्दीच्या भागामध्येही रुग्णसंख्येची वाढ कशी आहे याकडे लक्ष देण्यात येणार आहे. करोना नियंत्रणासाठी या पातळीवर काम करत असताना पूर्ण लसीकरण करण्यावरही भर देण्यात आला आहे. बूस्टर मात्रा कोणीही टाळू नये यासाठीही सातत्याने आवाहन केले जात आहे. सार्वजनिक आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील ३५ टक्के लाभार्थ्यांनी बूस्टर मात्रा घेतलेली आहे.
संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आशीष पाटील यांनी हे प्रमाण वाढण्याची गरज व्यक्त केली. साठ वर्ष वयोगटावरील व्यक्तीमध्ये सहआजारासह इतर काही व्याधी असू शकतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने या गटात करोना संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी झालेल्या विविध प्रकारच्या अभ्यासातून लसीकरणामुळे संसर्ग नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण योग्यवेळी करणे गरजेचे आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये या वयोगटामध्ये बूस्टर लसीकरणाचे प्रमाण वाढलेले नाही याबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
मृत सफाई कामगाराच्या पत्नीला १० लाखांची भरपाई द्या; राज्य सरकारला कोर्टाचे निर्देश
काही देशांमध्ये करोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहे ते लक्षात घेऊन राज्य सरकारनेही आता रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी काही वैद्यकीय खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात राज्याच्या कोणत्या भागामध्ये रुग्णसंख्या वाढती आहे, याकडे लक्ष देण्याच्याही सूचना आहे. शहरी- ग्रामीण तसेच जिल्हापातळीसह शहरामध्ये अधिक गर्दीच्या भागामध्येही रुग्णसंख्येची वाढ कशी आहे याकडे लक्ष देण्यात येणार आहे. करोना नियंत्रणासाठी या पातळीवर काम करत असताना पूर्ण लसीकरण करण्यावरही भर देण्यात आला आहे. बूस्टर मात्रा कोणीही टाळू नये यासाठीही सातत्याने आवाहन केले जात आहे. सार्वजनिक आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील ३५ टक्के लाभार्थ्यांनी बूस्टर मात्रा घेतलेली आहे.
संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आशीष पाटील यांनी हे प्रमाण वाढण्याची गरज व्यक्त केली. साठ वर्ष वयोगटावरील व्यक्तीमध्ये सहआजारासह इतर काही व्याधी असू शकतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने या गटात करोना संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी झालेल्या विविध प्रकारच्या अभ्यासातून लसीकरणामुळे संसर्ग नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण योग्यवेळी करणे गरजेचे आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये या वयोगटामध्ये बूस्टर लसीकरणाचे प्रमाण वाढलेले नाही याबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
मृत सफाई कामगाराच्या पत्नीला १० लाखांची भरपाई द्या; राज्य सरकारला कोर्टाचे निर्देश