अ‍ॅपशहर

मुंबईत २४ तासांत करोनाचे ५९ रुग्ण; मुख्यमंत्री पोहचले 'वॉर रूम'मध्ये

महाराष्ट्रात मुंबईमध्ये करोनाबाधीत रुग्णांची संख्या सर्वाधिक असून ही संख्या नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान मुंबई पालिका आणि राज्य शासनापुढे उभे ठाकले आहे. या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून त्यांनी आज थेट पालिका मुख्यालयात जाऊन स्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2020, 10:57 pm
मुंबई: मुंबईत २४ तासांत तब्बल ५९ करोनाबाधीत रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील करोनासंबंधित तयार करण्यात आलेल्या 'वॉर रूम' ला भेट दिली व आढावा घेतला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे. त्यासाठी तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीला सुरुवात करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुन्हा एकदा सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm-uddhavthackeray


करोनाशी लढ्याचा निर्णायक टप्पा जवळ आलाय: मुख्यमंत्री

राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईमधील लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी पालिकेचे उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. मुंबईतील करोनाचा वाढता प्रभाव, बाधीत रुग्णांची आणि संशयीत रुग्णांची संख्या, त्याबाबतची कारणे आणि पालिकेकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना याबाबतची तपशीलवार माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी आज जाणून घेतली.

राज्यात ७७ नवे करोनाग्रस्त; एकूण बाधीत ३००पार

याप्रसंगी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, करोना वॉर रूमच्या प्रमुख अधिकारी अश्विनी भिडे, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी उपस्थित होते.

सोशल डिस्टन्सिंग: CM स्वत: चालवतात कार

मुंबई पालिकेचे कर्मचारी कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात. अनेक गंभीर संकटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे अधिक जलदगतीने या संकटात काम करायचे आहे. आपल्या येथे रुग्णांच्या चाचणीचे अहवाल तातडीने मुख्यालयात कसे येतील, हे पाहिले पाहिजे. म्हणजे मुकाबला करण्यासाठी लगेच आवश्यक ते नियोजन करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपापल्या विभागातील खासगी डॉक्टरना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरू करण्याची विनंती करा. त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट आहे. विशेषत: वस्त्यांमधून स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील, त्याठिकाणी आवश्यक फवारणी होत राहील. हात धुण्यासाठी साबण उपलब्ध राहील याची काळजी घ्या. साथीचा आजार वस्त्यांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राहिली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

कोल्हापूर: २ करोना संशयितांच्या मृत्यूने धास्ती

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज