म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
नालेसफाईची कामे असमाधानकारक असून, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी मंगळवारी पालिका सभागृहात व्यक्त करण्यात आली. प्रशासकीय अनागोंदीमुळे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात केला. तसेच विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून, मे अखेरपर्यंत कामे पूर्ण होतील, असे स्पष्ट केले.
मुंबईत नालेसफाई अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एका निवेदनाद्वारे पालिका सभागृहात केला. यावर्षी नालेसफाईची कामे एप्रिलमध्ये सुरू झाली असली, तरी ती समाधानकारक नाहीत. पालिका आयुक्तांनीही मेट्रोच्या कामामुळे मुंबईकरांना त्रास होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच ज्यांच्या हातात पालिकेची सत्ता आहे, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली आहे. याची जबाबदारी मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांवर निश्चित केली आहे. याचा अर्थ पालिका प्रशासनावर आपला सत्ताधारी म्हणून अंकुश नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोप राजा यांनी केला.
यावर 'उद्धव ठाकरे असे एकमेव नेते आहेत की ते नालेसफाईच्या कामाची पाहणी करतात. नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असतील, तर ती पालिकेची जबाबदारी आहे. ही फक्त शिवसेनेची नाही, तर सर्व नगरसेवकांची जबाबदारी आहे,' असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. 'पावसाळ्यापूर्वी ६० टक्के नालेसफाई होते, हे सर्व नगरसेवकांना समजते. मात्र पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर होणारी ४० टक्के नालेसफाई कधी होते, हे समजतही नाही,' असा आरोप शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी केला. 'पावसाळा जवळ आला की, नालेसफाईवर चर्चा होते, मुंबईकरांना त्रास सहन करावाच लागतो,' असे भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
नालेसफाईची कामे असमाधानकारक असून, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी मंगळवारी पालिका सभागृहात व्यक्त करण्यात आली. प्रशासकीय अनागोंदीमुळे यंदाही मुंबईत पाणी तुंबणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात केला. तसेच विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून, मे अखेरपर्यंत कामे पूर्ण होतील, असे स्पष्ट केले.
मुंबईत नालेसफाई अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एका निवेदनाद्वारे पालिका सभागृहात केला. यावर्षी नालेसफाईची कामे एप्रिलमध्ये सुरू झाली असली, तरी ती समाधानकारक नाहीत. पालिका आयुक्तांनीही मेट्रोच्या कामामुळे मुंबईकरांना त्रास होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच ज्यांच्या हातात पालिकेची सत्ता आहे, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली आहे. याची जबाबदारी मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांवर निश्चित केली आहे. याचा अर्थ पालिका प्रशासनावर आपला सत्ताधारी म्हणून अंकुश नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोप राजा यांनी केला.
यावर 'उद्धव ठाकरे असे एकमेव नेते आहेत की ते नालेसफाईच्या कामाची पाहणी करतात. नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असतील, तर ती पालिकेची जबाबदारी आहे. ही फक्त शिवसेनेची नाही, तर सर्व नगरसेवकांची जबाबदारी आहे,' असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. 'पावसाळ्यापूर्वी ६० टक्के नालेसफाई होते, हे सर्व नगरसेवकांना समजते. मात्र पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर होणारी ४० टक्के नालेसफाई कधी होते, हे समजतही नाही,' असा आरोप शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी केला. 'पावसाळा जवळ आला की, नालेसफाईवर चर्चा होते, मुंबईकरांना त्रास सहन करावाच लागतो,' असे भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.