dipesh.more@timesgroup.com
tweet@dipeshmoreMT
मुंबई : हातून गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यास न्यायालय साधारणतः तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा सुनावते. मात्र ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी गिरगावच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या २८ जणांना अनोख्या शिक्षेला सामोरे जावे लागले. ध्वनिप्रदूषण केल्याची शिक्षा म्हणून सर्वांनी रोपटी घेऊन या, असे फर्मान महानगर दंडाधिकारी ए. आर. रहाणे यांनी सोडले. काही वेळातच सर्व आरोपी कुंड्यांवर आपली नावे चिकटवलेली रोपटी घेऊन आले.
गणपती विसर्जनादरम्यान आवाजमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०१७ आणि २०१८मध्ये गावदेवी आणि मलबार हिल पोलिसांनी दक्षिण मुंबईत ३० जणांवर पर्यावरण संरक्षण कायद्यांअंतर्गत कारवाई केली. यामध्ये बेंजो, नाशिक ढोलवादक तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांनी संबंधित पोलिस ठाण्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात दिले. यामध्ये वेगवेगळी कारणे देण्यात आली होती. याबाबतची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर या ३० जणांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यानुसार गुरुवारी सकाळी यातील २८ जण न्यायालयात हजर झाले. न्यायालय दंड ठोठावणार याची कल्पना असल्याने प्रत्येकाने आपल्यासोबत दंडाची रक्कम आणली होती.
या सर्वांना ११च्या सुमारास महानगर दंडाधिकारी रहाणे यांच्यासमोर हजर करण्यात आले. ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांअंतर्गत या सर्वांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगताच रहाणे यांनी प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. त्या इतक्यावरच थांबल्या नाहीत, तर 'पर्यावरणाची हानी ही चिंताजनक बाब आहे', असे मत मांडत, 'तुमच्या पर्यावरण संरक्षक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचे महत्त्व कळायलाच हवे', असे सांगत प्रत्येकाने एक रोपटे आणून जमा करा, असा आदेश दिला.
नर्सरीची शोधाशोध
महानगर दंडाधिकाऱ्यांनी रोप आणण्याचा आदेश देताच न्यायालयात कुजबूज सुरू झाली. यादरम्यान हे २८ जण न्यायालयाबाहेर आले आणि त्यांनी झाडांची नर्सरी शोधण्यास सुरुवात केली. दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या नर्सरीमधून त्यांनी कुंड्यांमध्ये लावण्यात आलेली वेगवेगळ्या प्रकारची रोपटी खरेदी केली. कागदावर नावे लिहून ती कुंड्यांवर चिकटविण्यात आली. त्यानंतर या सर्वांनी या कुंड्या न्यायालयात जमा केल्या. दिवसभराच्या या घडामोडींची गिरगाव न्यायालयात जोरदार चर्चा सुरू होती.
tweet@dipeshmoreMT
मुंबई : हातून गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यास न्यायालय साधारणतः तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा सुनावते. मात्र ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी गिरगावच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या २८ जणांना अनोख्या शिक्षेला सामोरे जावे लागले. ध्वनिप्रदूषण केल्याची शिक्षा म्हणून सर्वांनी रोपटी घेऊन या, असे फर्मान महानगर दंडाधिकारी ए. आर. रहाणे यांनी सोडले. काही वेळातच सर्व आरोपी कुंड्यांवर आपली नावे चिकटवलेली रोपटी घेऊन आले.
गणपती विसर्जनादरम्यान आवाजमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०१७ आणि २०१८मध्ये गावदेवी आणि मलबार हिल पोलिसांनी दक्षिण मुंबईत ३० जणांवर पर्यावरण संरक्षण कायद्यांअंतर्गत कारवाई केली. यामध्ये बेंजो, नाशिक ढोलवादक तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांनी संबंधित पोलिस ठाण्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात दिले. यामध्ये वेगवेगळी कारणे देण्यात आली होती. याबाबतची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर या ३० जणांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यानुसार गुरुवारी सकाळी यातील २८ जण न्यायालयात हजर झाले. न्यायालय दंड ठोठावणार याची कल्पना असल्याने प्रत्येकाने आपल्यासोबत दंडाची रक्कम आणली होती.
या सर्वांना ११च्या सुमारास महानगर दंडाधिकारी रहाणे यांच्यासमोर हजर करण्यात आले. ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांअंतर्गत या सर्वांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगताच रहाणे यांनी प्रत्येकाला पाच हजार रुपये दंड ठोठावला. त्या इतक्यावरच थांबल्या नाहीत, तर 'पर्यावरणाची हानी ही चिंताजनक बाब आहे', असे मत मांडत, 'तुमच्या पर्यावरण संरक्षक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचे महत्त्व कळायलाच हवे', असे सांगत प्रत्येकाने एक रोपटे आणून जमा करा, असा आदेश दिला.
नर्सरीची शोधाशोध
महानगर दंडाधिकाऱ्यांनी रोप आणण्याचा आदेश देताच न्यायालयात कुजबूज सुरू झाली. यादरम्यान हे २८ जण न्यायालयाबाहेर आले आणि त्यांनी झाडांची नर्सरी शोधण्यास सुरुवात केली. दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या नर्सरीमधून त्यांनी कुंड्यांमध्ये लावण्यात आलेली वेगवेगळ्या प्रकारची रोपटी खरेदी केली. कागदावर नावे लिहून ती कुंड्यांवर चिकटविण्यात आली. त्यानंतर या सर्वांनी या कुंड्या न्यायालयात जमा केल्या. दिवसभराच्या या घडामोडींची गिरगाव न्यायालयात जोरदार चर्चा सुरू होती.