म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर हे लोअर परळ भागात ज्या ठिकाणी मॅनहोलमध्ये पडले, त्या परिसरात महापालिकेने पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच या भागातील सर्वच मॅनहोलवर झाकणे बसवण्यात आली आहेत.
ऑगस्ट २०१७मध्ये लोअर परळ येथील दीपक सिनेमागृह परिसरात पावसाचे पाणी साचले होते. त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोलचे झाकण उघडले होते. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्याने त्यात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यावरून पालिकेवर मोठी टीका झाली होती. या प्रकारानंतर पालिकेने या परिसरातील पर्जन्यवाहिन्यांची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. लोअर परळ आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांच्या मध्ये असलेल्या पर्जन्यवाहिनीच्या सफाईसाठी मॅनहोल तयार करण्यात आले आहे. तसेच फितवाला मार्गाखाली असलेल्या बॉक्स ड्रेनचा व्यास १.६ मिटर बाय १.२ मिटर वरून २.६ मिटर बाय १.२ मिटर करण्यात आला आहे.
या परिसरातील टेक्स्टाइल मिल नाल्यात अडथळा ठरणारी ७० बांधकामे हटविण्यात आली आहेत. तसेच इतरही कामे करण्यात आली असून त्यामुळे या परिसरात पावसाळी पाण्याचा वेगाने निचरा होईल, असा दावा पालिकेने केला आहे.
बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर हे लोअर परळ भागात ज्या ठिकाणी मॅनहोलमध्ये पडले, त्या परिसरात महापालिकेने पर्जन्य वाहिन्यांची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच या भागातील सर्वच मॅनहोलवर झाकणे बसवण्यात आली आहेत.
ऑगस्ट २०१७मध्ये लोअर परळ येथील दीपक सिनेमागृह परिसरात पावसाचे पाणी साचले होते. त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोलचे झाकण उघडले होते. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्याने त्यात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यावरून पालिकेवर मोठी टीका झाली होती. या प्रकारानंतर पालिकेने या परिसरातील पर्जन्यवाहिन्यांची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. लोअर परळ आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांच्या मध्ये असलेल्या पर्जन्यवाहिनीच्या सफाईसाठी मॅनहोल तयार करण्यात आले आहे. तसेच फितवाला मार्गाखाली असलेल्या बॉक्स ड्रेनचा व्यास १.६ मिटर बाय १.२ मिटर वरून २.६ मिटर बाय १.२ मिटर करण्यात आला आहे.
या परिसरातील टेक्स्टाइल मिल नाल्यात अडथळा ठरणारी ७० बांधकामे हटविण्यात आली आहेत. तसेच इतरही कामे करण्यात आली असून त्यामुळे या परिसरात पावसाळी पाण्याचा वेगाने निचरा होईल, असा दावा पालिकेने केला आहे.