मुंबई: राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून परराज्यातून सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. ( Rajesh Tope On Oxygen Shortage In Maharashtra ) वाचा: राज्यात कोणत्याही क्षणी कठोर निर्बंध; गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ऑक्सिजन बाबत सद्यस्थिती सांगितली. राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणांसाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, असे टोपे म्हणाले.
वाचा: करोनावरील लस घरोघरी जावून द्या: नाना पटोले
राज्यात सध्या एकूण १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे. केंद्र शासनदेखील सुमारे ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्री टोपे यांनी वर्तविली आहे. राज्यात सहा ठिकाणे अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते मात्र, त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा विचार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी नमूद केले. पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर सी एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता ९८ टक्के आहे. हा ऑक्सिजन रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३००० खाटांची भर पडणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
वाचा: नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; अजित पवार म्हणाले...
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिल्याचे टोपे यांनी सांगितले. सीरम इन्स्टिट्युट सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत रुग्णालयांसाठी प्रति डोस ४०० तर खासगी रुग्णालयांसाठी प्रति डोस ६०० रुपये प्रमाणे दर आकारणार आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लसीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लसीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये आहे. या सर्वच लसींचा उपयोग करून राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
वाचा: मुंबई: कोविड सेंटरमध्ये करोना रुग्णाचा नर्सवर जीवघेणा हल्ला
राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ऑक्सिजन बाबत सद्यस्थिती सांगितली. राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणांसाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, असे टोपे म्हणाले.
वाचा: करोनावरील लस घरोघरी जावून द्या: नाना पटोले
राज्यात सध्या एकूण १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जात आहे. केंद्र शासनदेखील सुमारे ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्री टोपे यांनी वर्तविली आहे. राज्यात सहा ठिकाणे अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते मात्र, त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा विचार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी नमूद केले. पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर सी एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता ९८ टक्के आहे. हा ऑक्सिजन रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३००० खाटांची भर पडणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
वाचा: नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; अजित पवार म्हणाले...
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिल्याचे टोपे यांनी सांगितले. सीरम इन्स्टिट्युट सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत रुग्णालयांसाठी प्रति डोस ४०० तर खासगी रुग्णालयांसाठी प्रति डोस ६०० रुपये प्रमाणे दर आकारणार आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लसीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लसीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये आहे. या सर्वच लसींचा उपयोग करून राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
वाचा: मुंबई: कोविड सेंटरमध्ये करोना रुग्णाचा नर्सवर जीवघेणा हल्ला