मुंबई : जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा फैलाव सुरू केला आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. अनेक राज्यांमध्ये करोना संसर्गाने पुन्हा एकदा धोक्याची घंटा दिली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून काही आकडेवारी समोर येत आहे. जूनच्या पहिल्या ४ दिवसांत संसर्गाने विक्रम मोडला. या महिन्यात आतापर्यंत ३,०९५ प्रकरणं समोर आली आहेत. मार्चमध्ये आलेल्या १५१९ प्रकरणांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे. एप्रिल (१,१७९५) च्या तुलनेत हे ६० टक्के अधिक आहेत. मे (५,८३८) च्या तुलनेत अवघ्या चार दिवसांत ही आकडेवारी ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
आतापर्यंत जूनमध्ये पहिल्या चार दिवसांत महाराष्ट्रात करोनाचे ४ हजार ६१८ रुग्ण आढळले. यापैकी ६० टक्के प्रकरणं एकट्या मुंबईतली आहेत. शनिवारी महाराष्ट्रात करोना संसर्गाची १,३५७ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आणि साथीच्या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यापैकी ८८९ प्रकरणं मुंबईतील आहेत.
चौथ्या लाटेची शक्यता...
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे निरीक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यांच्या मते ही करोनाची चौथी लाट नाही. पुढील काही आठवड्यात प्रकरणं वाढू शकतात. मात्र, त्यात पुन्हा घसरण होईल. हवामान बदलांमुळे आरोग्य ढासळत आहे. त्यामुळे शासनाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना सावधगिरी बाळगून आवश्यक उपाययोजना करण्याचं पत्र दिलं आहे.
मुंबईसह इतर पाच जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या कमी असल्याने केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने सहा जिल्ह्यांना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले. मुंबईमध्ये शनिवारी १०,२५७ चाचण्या करण्यात आल्या.
सर्व नमुन्यांचे जनुकीय निर्धारण
करोना संसर्गाच्या निदानासाठी जे नमुने घेतले जात आहेत, त्यात पॉझिटिव्ह आलेल्या सर्व नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जात आहे. ओमायक्रॉन संसर्गाचा फैलाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. सध्या असलेल्या बीए४ आणि बीए ५ या विषाणूचा संसर्ग किती प्रमाणात आहे हे तपासण्यासाठी या चाचण्या करण्यात येत आहे. 'संसर्ग किती आहे याचा अभ्यास करण्यासाठी या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याशिवाय रुग्णसंख्या इतक्या वेगाने का वाढते आहे हे लक्षात येणे अवघड आहे', असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
आतापर्यंत जूनमध्ये पहिल्या चार दिवसांत महाराष्ट्रात करोनाचे ४ हजार ६१८ रुग्ण आढळले. यापैकी ६० टक्के प्रकरणं एकट्या मुंबईतली आहेत. शनिवारी महाराष्ट्रात करोना संसर्गाची १,३५७ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आणि साथीच्या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यापैकी ८८९ प्रकरणं मुंबईतील आहेत.
चौथ्या लाटेची शक्यता...
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे निरीक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यांच्या मते ही करोनाची चौथी लाट नाही. पुढील काही आठवड्यात प्रकरणं वाढू शकतात. मात्र, त्यात पुन्हा घसरण होईल. हवामान बदलांमुळे आरोग्य ढासळत आहे. त्यामुळे शासनाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना सावधगिरी बाळगून आवश्यक उपाययोजना करण्याचं पत्र दिलं आहे.
मुंबईसह इतर पाच जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या कमी असल्याने केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने सहा जिल्ह्यांना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले. मुंबईमध्ये शनिवारी १०,२५७ चाचण्या करण्यात आल्या.
सर्व नमुन्यांचे जनुकीय निर्धारण
करोना संसर्गाच्या निदानासाठी जे नमुने घेतले जात आहेत, त्यात पॉझिटिव्ह आलेल्या सर्व नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जात आहे. ओमायक्रॉन संसर्गाचा फैलाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. सध्या असलेल्या बीए४ आणि बीए ५ या विषाणूचा संसर्ग किती प्रमाणात आहे हे तपासण्यासाठी या चाचण्या करण्यात येत आहे. 'संसर्ग किती आहे याचा अभ्यास करण्यासाठी या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याशिवाय रुग्णसंख्या इतक्या वेगाने का वाढते आहे हे लक्षात येणे अवघड आहे', असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.