अ‍ॅपशहर

मुंबईत करोनाची आकडेवारी वाढली, जूनच्या ४ दिवसांत मार्चच्या तुलनेत दुप्पट प्रकरणं समोर...

covid cases maharashtra : महाराष्ट्रात शनिवारी करोना विषाणू संसर्गाची १,३५७ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि साथीच्या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यापैकी ८८९ प्रकरणे मुंबईतील आहेत.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2022, 9:49 am
मुंबई : जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा फैलाव सुरू केला आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. अनेक राज्यांमध्ये करोना संसर्गाने पुन्हा एकदा धोक्याची घंटा दिली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून काही आकडेवारी समोर येत आहे. जूनच्या पहिल्या ४ दिवसांत संसर्गाने विक्रम मोडला. या महिन्यात आतापर्यंत ३,०९५ प्रकरणं समोर आली आहेत. मार्चमध्ये आलेल्या १५१९ प्रकरणांच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट आहे. एप्रिल (१,१७९५) च्या तुलनेत हे ६० टक्के अधिक आहेत. मे (५,८३८) च्या तुलनेत अवघ्या चार दिवसांत ही आकडेवारी ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona


आतापर्यंत जूनमध्ये पहिल्या चार दिवसांत महाराष्ट्रात करोनाचे ४ हजार ६१८ रुग्ण आढळले. यापैकी ६० टक्के प्रकरणं एकट्या मुंबईतली आहेत. शनिवारी महाराष्ट्रात करोना संसर्गाची १,३५७ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आणि साथीच्या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यापैकी ८८९ प्रकरणं मुंबईतील आहेत.

झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने वाढवले टेन्शन; अशी आहे मुंबईतील ताजी स्थिती
चौथ्या लाटेची शक्यता...

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे निरीक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यांच्या मते ही करोनाची चौथी लाट नाही. पुढील काही आठवड्यात प्रकरणं वाढू शकतात. मात्र, त्यात पुन्हा घसरण होईल. हवामान बदलांमुळे आरोग्य ढासळत आहे. त्यामुळे शासनाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना सावधगिरी बाळगून आवश्यक उपाययोजना करण्याचं पत्र दिलं आहे.

मुंबईसह इतर पाच जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या कमी असल्याने केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने सहा जिल्ह्यांना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले. मुंबईमध्ये शनिवारी १०,२५७ चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत २ महिला, ४ अल्पवयीन मुलांनी मिळून पुरुषाला काठ्यांनी मारलं, मृत्यूनंतर धक्कादायक कारण समोर...

सर्व नमुन्यांचे जनुकीय निर्धारण

करोना संसर्गाच्या निदानासाठी जे नमुने घेतले जात आहेत, त्यात पॉझिटिव्ह आलेल्या सर्व नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण केले जात आहे. ओमायक्रॉन संसर्गाचा फैलाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. सध्या असलेल्या बीए४ आणि बीए ५ या विषाणूचा संसर्ग किती प्रमाणात आहे हे तपासण्यासाठी या चाचण्या करण्यात येत आहे. 'संसर्ग किती आहे याचा अभ्यास करण्यासाठी या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याशिवाय रुग्णसंख्या इतक्या वेगाने का वाढते आहे हे लक्षात येणे अवघड आहे', असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज