अ‍ॅपशहर

मास्क वापरणे थांबवू नये, मुख्यमंत्र्यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन

राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. यामुळे राज्याचं आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 27 May 2022, 7:41 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : 'करोनारुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून, राज्यातील नागरिकांनी मास्क वापरणे थांबवू नये,' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून केले. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली, तरी करोना पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असून, ते वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid cases rising in maharashtra cm uddhav thackeray appeal wearing mask
मास्क वापरणे थांबवू नये, मुख्यमंत्र्यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन


राज्याचे साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १.५९ टक्के असून, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते आहे. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून, ठाण्यामध्ये २७.२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात अनुक्रमे १८.५२ टक्के, तर ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तसेच १८पेक्षा जास्त वयाच्या ९२.२७ टक्के नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज