मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण व ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन यांच्या हत्येच्या प्रकरणात तुरुंगात असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याचा ताबा अखेर मुंबई पोलिसांकडे आला आहे. एका खंडणीच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तळोजा तुरुंगातून त्याचा ताबा घेण्यात आला. ६ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली असून चौकशीत तो नेमकं काय बोलणार, याकडं लक्ष लागलं आहे. हॉटेल व्यावसायिक बिनल अग्रवाल यांनी सचिन वाझेच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली होती. हॉटेल आणि बारवर धाड न टाकण्याच्या बदल्यात वाझेने त्यांच्याकडून ९ लाख रुपये व जवळपास तीन लाखांचे दोन महागडे फोन घेतले होते, अशी तक्रार अग्रवाल यांनी केली होती. त्या आधारे वाझेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वाझेचा ताबा मागितला होता. विशेष न्यायालयानं शुक्रवारी मुंबई पोलिसांना ताबा घेण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याचा ताबा घेण्यात आला. तिथून त्याला एस्प्लेनेड कोर्टात हजर केलं गेलं. वाझेला दहा दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मात्र, न्यायालयानं त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाचा: शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये राज्यातील मंत्र्याचं नाव?
सचिन वाझेसह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाझ भाटी यांच्या विरुद्ध याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरण उजेडात आल्यानंतर आणि त्यात वाझेचा सहभाग असल्याचा पुरावा हाती आल्यापासून तो एनआयच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या होत्या. त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
वाचा: फडणवीसांचं आव्हान नवाब मलिक यांनी स्वीकारलं; ट्वीट करून म्हणाले...
वाचा: शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये राज्यातील मंत्र्याचं नाव?
सचिन वाझेसह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाझ भाटी यांच्या विरुद्ध याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरण उजेडात आल्यानंतर आणि त्यात वाझेचा सहभाग असल्याचा पुरावा हाती आल्यापासून तो एनआयच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या होत्या. त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.
वाचा: फडणवीसांचं आव्हान नवाब मलिक यांनी स्वीकारलं; ट्वीट करून म्हणाले...