मुंबई : ‘सायबर गुन्ह्यांचे समाजावर होणारे परिणाम पाहिले, तर अणुबॉम्बसारखा दूरगामी धोका आहे,’ असे मत महिला व बालविकास आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी व्यक्त केले. 'रिस्पॅान्सिबल नेटिझम' या सामाजिक संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 'महिला व बालकांच्या संदर्भातील सायबर गुन्ह्यांचा तपास' या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन आणि सायबर संबंधित समस्यांवर मदत, मार्गदर्शन आणि समुपदेशन करणाऱ्या '७३५३१०७३५३' या हेल्पलाइनचे लोकार्पण करण्यात आले. गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही 'सायबर वेलनेस सेंटर' सुरू करायच्या तयारीला लागा, असे आवाहन लोढा यांनी संस्थेच्या प्रतिनिधींना केले.
सायबर विश्वात वावरताना घायची काळजी, सायबर गुन्हे, महिला व मुलांनी बाळगायची सावधगिरी, सायबर जनजागृती, अशा विषयांवर काम करणाऱ्या 'रिस्पॅान्सिबल नेटिझम' या संस्थेने दहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मंगलप्रभात लोढा यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ‘आपण करत असलेले काम हे जबाबदार नागरिकाचे असून ही सध्या सर्वसामान्य नागरिकाची, महाराष्ट्राची गरज आहे. सायबरशिवाय सध्या पर्याय नाही, मात्र सोशल मीडियामुळे अतिरेक वाढला असून अनेकांना सायबर विकार जडला आहे. भविष्यात सोशल मीडिया रुग्णालय सुरू करायला लागले, तरी नवल वाटायला नको. हे करण्याची वेळ येऊ नये, यासाठी रिस्पॅान्सिबल नेटिझमसारख्या संस्था काम करत आहेत. आपण त्यांना सहकार्य करायला हवे,’ असे लोढा म्हणाले.
अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंह, अॅड. वैशाली भागवत, अनुराधा सोहनी आणि रिस्पॅान्सिबल नेटिझमच्या संचालिका सोनाली पाटणकर यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले, तसेच संस्थेच्या कार्याबाबत गौरव केला. यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक अशोक पानवलकर, सुजय पत्की, अभिजीत पानसरे, कौशल इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 'रिस्पॅान्सिबल नेटिझम'चे उन्मेष जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सायबर विश्वात वावरताना घायची काळजी, सायबर गुन्हे, महिला व मुलांनी बाळगायची सावधगिरी, सायबर जनजागृती, अशा विषयांवर काम करणाऱ्या 'रिस्पॅान्सिबल नेटिझम' या संस्थेने दहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मंगलप्रभात लोढा यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ‘आपण करत असलेले काम हे जबाबदार नागरिकाचे असून ही सध्या सर्वसामान्य नागरिकाची, महाराष्ट्राची गरज आहे. सायबरशिवाय सध्या पर्याय नाही, मात्र सोशल मीडियामुळे अतिरेक वाढला असून अनेकांना सायबर विकार जडला आहे. भविष्यात सोशल मीडिया रुग्णालय सुरू करायला लागले, तरी नवल वाटायला नको. हे करण्याची वेळ येऊ नये, यासाठी रिस्पॅान्सिबल नेटिझमसारख्या संस्था काम करत आहेत. आपण त्यांना सहकार्य करायला हवे,’ असे लोढा म्हणाले.
अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंह, अॅड. वैशाली भागवत, अनुराधा सोहनी आणि रिस्पॅान्सिबल नेटिझमच्या संचालिका सोनाली पाटणकर यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले, तसेच संस्थेच्या कार्याबाबत गौरव केला. यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक अशोक पानवलकर, सुजय पत्की, अभिजीत पानसरे, कौशल इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 'रिस्पॅान्सिबल नेटिझम'चे उन्मेष जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.