म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
कोणतीही आपत्ती कोसळली की, ज्याप्रमाणे दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येऊन सढळ हस्ते मदत करतात, त्याचप्रमाणे काही भामटे, समाजकंटक या परिस्थितीचाही पुरेपूर गैरफायदा घेतात. राज्यात आलेल्या महापुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून त्यांना मदत करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना फसविले जात आहे. विविध संस्थांच्या नावे समाजमाध्यमांवर जाहिराती करून मदत वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात स्वीकारली जात असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मार्च २०२० पासून करोनाचा संसर्ग सुरू असून तेव्हापासून राज्यासह देशभरात लॉकडाउन लावण्यात आला आहे. या कालावधीत मदतीच्या बहाण्याने लोकांची फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने तज्ज्ञाचा एक अभ्यास गट तयार केला आहे. ऑनलाइन सायबर गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणाऱ्या या गटातील तज्ज्ञांना एक नवीन बाब आढळून आली आहे. राज्यात अचानक आलेल्या पुरामुळे सायबर भामट्यांनी गुन्ह्यांची पद्धत बदलल्याचे आढळले आहे.
पुरामध्ये झालेली जीवितहानी आणि वित्तहानी याबाबतचे फोटो आणि त्यासोबत सामाजिक संस्थांच्या नावाचा वापर करून वस्तू आणि पैसे स्वीकारले जात आहेत. काही संस्थांच्या नावाचे प्रोफाइल तयार करून ती संस्था आपणच चालवीत असल्याचे भासविले जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये पैसे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी संस्थांच्या ऐवजी वैयक्तिक खात्याचा तपशील दिला जात असल्याचे दिसून आले आहे.
हे लक्षात ठेवा
- समाजमाध्यमांवर, इंटनेटरवरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
- कुणाच्याही प्रोफाइलवर, लिंक वर क्लिक करू नका.
- मदत करण्यापूर्वी संस्था अधिकृत असल्याची खात्री करा.
- शहानिशा केल्याविना समाजमाध्यमांवर मदतीचे संदेश व्हायरल करू नका.
- ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना बँक खाते, डेबिट कार्डचा तपशील देऊ नका.
- फसवणूक झाल्यास www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा
कोणतीही आपत्ती कोसळली की, ज्याप्रमाणे दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येऊन सढळ हस्ते मदत करतात, त्याचप्रमाणे काही भामटे, समाजकंटक या परिस्थितीचाही पुरेपूर गैरफायदा घेतात. राज्यात आलेल्या महापुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून त्यांना मदत करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना फसविले जात आहे. विविध संस्थांच्या नावे समाजमाध्यमांवर जाहिराती करून मदत वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात स्वीकारली जात असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मार्च २०२० पासून करोनाचा संसर्ग सुरू असून तेव्हापासून राज्यासह देशभरात लॉकडाउन लावण्यात आला आहे. या कालावधीत मदतीच्या बहाण्याने लोकांची फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने तज्ज्ञाचा एक अभ्यास गट तयार केला आहे. ऑनलाइन सायबर गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणाऱ्या या गटातील तज्ज्ञांना एक नवीन बाब आढळून आली आहे. राज्यात अचानक आलेल्या पुरामुळे सायबर भामट्यांनी गुन्ह्यांची पद्धत बदलल्याचे आढळले आहे.
पुरामध्ये झालेली जीवितहानी आणि वित्तहानी याबाबतचे फोटो आणि त्यासोबत सामाजिक संस्थांच्या नावाचा वापर करून वस्तू आणि पैसे स्वीकारले जात आहेत. काही संस्थांच्या नावाचे प्रोफाइल तयार करून ती संस्था आपणच चालवीत असल्याचे भासविले जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये पैसे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी संस्थांच्या ऐवजी वैयक्तिक खात्याचा तपशील दिला जात असल्याचे दिसून आले आहे.
हे लक्षात ठेवा
- समाजमाध्यमांवर, इंटनेटरवरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
- कुणाच्याही प्रोफाइलवर, लिंक वर क्लिक करू नका.
- मदत करण्यापूर्वी संस्था अधिकृत असल्याची खात्री करा.
- शहानिशा केल्याविना समाजमाध्यमांवर मदतीचे संदेश व्हायरल करू नका.
- ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना बँक खाते, डेबिट कार्डचा तपशील देऊ नका.
- फसवणूक झाल्यास www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा