अ‍ॅपशहर

दहीहंडीची संख्या आणि उत्साह रोडावला!

दहिहंडी आयोजनांमध्ये झालेली घट, बक्षिसांच्या जाहीर न झालेल्या रकमा यामुळे यंदा दहिहंडीचा उत्साह काहीसा कमी दिसण्याची शक्यता आहे. थरांच्या उंचीची चुरस फारशी नसली तरीही अनेक गोविंदा मंडळांनी परंपरा राखत आपल्या विभागातून बाहेर पडत उत्सवाचा आनंद लुटण्याचे ठरवले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 24 Aug 2019, 8:35 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम DAHIHANDI


दहिहंडी आयोजनांमध्ये झालेली घट, बक्षिसांच्या जाहीर न झालेल्या रकमा यामुळे यंदा दहिहंडीचा उत्साह काहीसा कमी दिसण्याची शक्यता आहे. थरांच्या उंचीची चुरस फारशी नसली तरीही अनेक गोविंदा मंडळांनी परंपरा राखत आपल्या विभागातून बाहेर पडत उत्सवाचा आनंद लुटण्याचे ठरवले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी आयोजनांचे नवे विक्रम नोंदवले जातील आणि त्यातून मिळणाऱ्या बक्षिसांमधून गोविंदा मंडळांची घागर भरेल अशी अपेक्षा होती. पण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारण्यासाठी सुरू झालेली मोहीम, अनेक मतदारसंघात बदललेली राजकीय गणिते यामुळे दहिहंडी आयोजनांची संख्या यंदा तब्बल ७० टक्क्यांनी कमी झाली आहे. शिवाय बक्षिसांच्या रकमाही जाहीर न झाल्यामुळे करायचे तरी काय, या संभ्रमात गोविंदा मंडळे आहेत.

'उच्च न्यायालयात उत्सवाच्या विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर अनेक आयोजकांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बक्षिसांची रक्कम गेल्या चार वर्षांपासून तोकडीच आहे. मात्र तरीही मंडळांनी उत्सवाची परंपरा खंडित केलेली नाही. त्यामुळे पैशांसाठी थरांची स्पर्धा करतात या आरोपांमध्ये तथ्य वाटत नाही. या आयोजनातील डामडौल कमी व्हावा यासाठी आम्हीही आग्रही आहोत. गोविंदा पथक तसेच आयोजक सुरक्षेच्या नियमांचे पालन करत सुरक्षित दहीहंडीचा पायंडा रचतील,' असे मत दहिहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज